शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:19 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. इगतपुरी धामणगाव येथील गणेश नंदू बरतड या २५ वर्षीय तरु णाला शनिवारी (दि.१६) रोजी शेतात काम करत असतांना भात कापणी यंत्र चालवतांना अतिविषारी सर्प दंश झाला होता. ही माहिती सरपंच शिवाजी गाढवे यांना कळताच सरपंच त्यांनी तात्काळ आपले सहकारी ज्ञानेश्वर कोंडूळे, राजू गाढवे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व गणेशला तात्काळ एस.एम.बी.टी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिविषारी सर्प दंश झाल्याने गणेशच्या शरीररातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होऊन रक्तवाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे त्याचे शरीर पूर्ण काळे पडले होते. रक्तवाहिन्या बंद झाल्याने व शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन बाहेरून आॅक्सिजन देण्यात आला.बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केलेल्या तरु णावर लवकर उपचार करण्यात यावे यासाठी एस.एम.बी.टी रु ग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे, मुख्य व्यवस्थापक कुर्हे, वरपे, डॉ.प्रदीप नाईक, डॉ.बागडे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे यांच्या प्रयत्नामुळे व सर्वांच्याच धावपळीमुळे डॉ.माने यांच्या मार्फत उपचार करण्यात आले. गणेश हा रु ग्णालयात तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती मृत्यशी झुंज देत होता. तात्काळ सुविधा देऊन योग्य उपचार झाल्याने तब्बल दहा दिवसानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. आपल्या मुलाच्या जीव वाचला ही माहिती सर्प दंश रु ग्ण गणेश बरतड याच्या आई वडील नातेवाईकांना समजताच सर्वांनी मोकळा श्वास सोडला व सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.-----------------तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती ठेऊन बाहेरून प्राणवायू देऊन गणेशवर उपचार चालू होते.अखेर दहा दिवसाच्या संघर्षानंतर गणेश शुद्धीवर आला.त्याचा जीव वाचला यामध्ये आमचे ज्युनिअर डॉ, नर्स, स्टाफ यांचे अथक प्रयत्न होते याचे मला समाधान वाटते.- डॉ.अनिल माने, एस.एम.बी.टी रु ग्णालय--------------आज पुन्हा एकदा डॉ.माने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृत्यच्या दारात असलेल्या गणेशचा प्राण वाचला.त्याचे समाधान वाटत आहे.- शिवाजी गाढवे, सरपंच धामणगाव

टॅग्स :Nashikनाशिक