शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 01:34 IST

आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देअपघाताची मालिका सुरूच : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.नाशिक शहर व जिल्ह्याला जोडणारा तसेच गोंदे दुमाला, अंबड व सातपूर या तीन अत्यंत मोठ्या औद्योगिक वसाहतीनाही जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने शेकडो नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.दरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, एकपदरी असलेल्या या रस्त्यावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे.रस्ता ठिकठिकाणी उंच सखल झाला असून, साइडपट्ट्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेक छोटेमोठे अपघात घडले होत असून, स्थानिक युवकांना याचा तीव्र आर्थिक फटका बसला आहे.सार्व.बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण सुरू न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा सांजेगावचे माजी चेअरमन केरू पा गोवर्धने, सरपंच सविता गोवर्धने, चेअरमन लहानु पा गोवर्धने, आहुर्लीचे सरपंच राजाराम गायकर, चेअरमन रघुनाथ पा. खातळे, माजी चेअरमन नवनाथ गायकर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद खकाळे, रामदास गायकर, रंगनाथ खातळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खातळे, बाबूराव लक्ष्मण खातळे, साहेबराव खातळे, दत्तू गायकर, नानासाहेब गोवर्धने, माजी सरपंच संजय लक्ष्मण गोवर्धने, देवराम गोवर्धने,. बाळू गेणू गोवर्धने, गोकुळ मते, सचिन मते, दत्तू मते, शंकर मते, भिका पा. मेदडे, नितीन गोवर्धने, अशोक आहेर, शंकर सराई, त्रिंबक सराई, एकनाथ सदगिर, सरपंच गोकुळ सदगिर, वैभव गोऱ्हे, कचरू पा. धात्रक, कचरू बागुल आदींसह असंख्य नागरिकांनी केली आहे.यात सगळ्यात जास्त पडझड दुचाकीस्वाराची होते. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पडलेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकीची व डोळेझाकपणाची झळ आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कामगार, मजूर यांना बसत आहे.यापुढे असे छोटे-मोठे अपघात झाले तर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यावर बिनदिक्कतपणे गुन्हे दाखल करू.- बाळासाहेब गोवर्धने, त्रस्त नागरिक.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा