शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 01:34 IST

आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देअपघाताची मालिका सुरूच : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.नाशिक शहर व जिल्ह्याला जोडणारा तसेच गोंदे दुमाला, अंबड व सातपूर या तीन अत्यंत मोठ्या औद्योगिक वसाहतीनाही जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने शेकडो नागरिकांची सातत्याने वर्दळ असते.दरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, एकपदरी असलेल्या या रस्त्यावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे.रस्ता ठिकठिकाणी उंच सखल झाला असून, साइडपट्ट्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेक छोटेमोठे अपघात घडले होत असून, स्थानिक युवकांना याचा तीव्र आर्थिक फटका बसला आहे.सार्व.बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण सुरू न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा सांजेगावचे माजी चेअरमन केरू पा गोवर्धने, सरपंच सविता गोवर्धने, चेअरमन लहानु पा गोवर्धने, आहुर्लीचे सरपंच राजाराम गायकर, चेअरमन रघुनाथ पा. खातळे, माजी चेअरमन नवनाथ गायकर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद खकाळे, रामदास गायकर, रंगनाथ खातळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खातळे, बाबूराव लक्ष्मण खातळे, साहेबराव खातळे, दत्तू गायकर, नानासाहेब गोवर्धने, माजी सरपंच संजय लक्ष्मण गोवर्धने, देवराम गोवर्धने,. बाळू गेणू गोवर्धने, गोकुळ मते, सचिन मते, दत्तू मते, शंकर मते, भिका पा. मेदडे, नितीन गोवर्धने, अशोक आहेर, शंकर सराई, त्रिंबक सराई, एकनाथ सदगिर, सरपंच गोकुळ सदगिर, वैभव गोऱ्हे, कचरू पा. धात्रक, कचरू बागुल आदींसह असंख्य नागरिकांनी केली आहे.यात सगळ्यात जास्त पडझड दुचाकीस्वाराची होते. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पडलेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकीची व डोळेझाकपणाची झळ आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कामगार, मजूर यांना बसत आहे.यापुढे असे छोटे-मोठे अपघात झाले तर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यावर बिनदिक्कतपणे गुन्हे दाखल करू.- बाळासाहेब गोवर्धने, त्रस्त नागरिक.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा