शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

रहाडी गावात सकाळी ढगफुटी होते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:15 IST

जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली.

जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना घटनेबाबत अवगत करून तालुका व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. घटनेनंतर काही वेळातच उपविभागीय अधिकारी सोपान कासार व तहसीलदार प्रमोद हिले बचाव पथकासह घटनास्थळी दाखल होऊन लगेचच मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात येऊन प्रशासन सोबत असल्याचा दिलासा नागरिकांना देण्यात आला. खरीखुरी अन अंगावर रोमांच उभे राहतील, अशी ही घटना घडल्याचे नागरिकांना कळताच त्यांच्याही मनात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. मात्र, अचानकपणे उद्भभवलेल्या आपत्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी किती तत्पर आहे, याबद्दलची ही प्रात्यक्षिके असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.येवला शहरापासून सुमारे ३५ किमी दूर असलेल्या रहाडी येथे महसूल, अग्निशमन दल, पोलीस, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग आदींसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अवघ्या ४० मिनिटात घटनस्थळी पोहोचून कार्यरत झाल्या. दरम्यान, संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर अग्निशमन दल येवला, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. याप्रसंगी येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार, नाशिक ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदुरकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगले, तालुका आरोग्य अधिकारी नेहते, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांसाठी हजर होते.----------------------नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय यंत्रणेची धावपळ होऊ नये व नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळली जावी, यासाठी रहाडी येथे झालेली रंगीत तालीम अत्यंत महत्त्वाची व गरजेची होती. ऐन वेळी उपस्थित ग्रामस्थ व स्वयंसेवकांना आवश्यक मार्गदर्शन व अशा परिस्थितीत करावयाची कामे याची माहिती त्यांना मिळणे गरजेचे होते. ते या माध्यमातून त्यांना योग्यरित्या समजले.- राजू काळे, तलाठी, रहाडी

टॅग्स :Nashikनाशिक