शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

रहाडी गावात सकाळी ढगफुटी होते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:15 IST

जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली.

जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना घटनेबाबत अवगत करून तालुका व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. घटनेनंतर काही वेळातच उपविभागीय अधिकारी सोपान कासार व तहसीलदार प्रमोद हिले बचाव पथकासह घटनास्थळी दाखल होऊन लगेचच मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात येऊन प्रशासन सोबत असल्याचा दिलासा नागरिकांना देण्यात आला. खरीखुरी अन अंगावर रोमांच उभे राहतील, अशी ही घटना घडल्याचे नागरिकांना कळताच त्यांच्याही मनात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. मात्र, अचानकपणे उद्भभवलेल्या आपत्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी किती तत्पर आहे, याबद्दलची ही प्रात्यक्षिके असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.येवला शहरापासून सुमारे ३५ किमी दूर असलेल्या रहाडी येथे महसूल, अग्निशमन दल, पोलीस, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग आदींसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अवघ्या ४० मिनिटात घटनस्थळी पोहोचून कार्यरत झाल्या. दरम्यान, संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर अग्निशमन दल येवला, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. याप्रसंगी येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार, नाशिक ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदुरकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगले, तालुका आरोग्य अधिकारी नेहते, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांसाठी हजर होते.----------------------नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत शासकीय यंत्रणेची धावपळ होऊ नये व नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळली जावी, यासाठी रहाडी येथे झालेली रंगीत तालीम अत्यंत महत्त्वाची व गरजेची होती. ऐन वेळी उपस्थित ग्रामस्थ व स्वयंसेवकांना आवश्यक मार्गदर्शन व अशा परिस्थितीत करावयाची कामे याची माहिती त्यांना मिळणे गरजेचे होते. ते या माध्यमातून त्यांना योग्यरित्या समजले.- राजू काळे, तलाठी, रहाडी

टॅग्स :Nashikनाशिक