शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:20 IST

नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे.

नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे.गेल्या २0 ते २५ दिवसांपासून संचारबंदीमुळे रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा कसा ओढावा, असा प्रश्न या रिक्षाचालकांसमोर असून, कुटुंबाची उपासमार होत आहे. काहींचे घरांचे हप्ते थकले असून, कुणाच्या घरात किराणा संपल्यामुळे त्यासाठी पुरेसे पैसेदेखील नाहीत. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, तसेच काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेमध्ये रिक्षाचा समावेश करून आम्हाला त्यात सहभागी करून घ्यावे, असे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या रिक्षाचालकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याची खंत अनेक रिक्षाचालकांनी बोलून दाखविली.विशेषत: रिक्षाचालकांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. सर्वसामान्य रिक्षाचालकाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी, अशी मागणी शहरातील रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.-------------------प्रत्येक रिक्षाचालकाचे कमीत कमी चार ते पाच जणांचे कुटुंब आहे. त्यांची सध्या उपासमार होत असून आर्थिककोंडी झाली आहे. रिक्षाचालकांनी मदत कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचा दैनंदिन खर्च, आजारपणात येणारा खर्च करायला पैसे नाहीत. घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय? महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केलेली आहे, परंतु त्याच्यात रिक्षाचालकांचा उल्लेख कोठेही नाही, याची खंत वाटते. - सचिन पगारे, पंचवटी---------------------घराचे हप्ते थकले आमच्या संसाराचा गाडा हा रिक्षावरच अवलंबून असल्याने रिक्षा चालली तर आमचा संसार चालतो. आता सर्वच व्यवसाय व्यवहार ठप्प झाल्याने पैसे आणणार कुठून, त्यात घराचे हप्ते थकले आहेत. तसेच रिक्षाचे हप्तेदेखील बाकी आहे. आम्हाला रहदारीला परवानगी मिळावी, आम्ही नियम पाळून व्यवसाय करू.- विनोद भावसार, म्हसरूळ--------------------------सरकारने मार्ग काढावा गेल्या २0 ते २५ दिवसांपासून रिक्षा वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही घरीच बसून आहोत, दुसरा कोणताच उद्योग व्यवसाय करणेदेखील शक्य नाही. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मुलाबाळांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीदेखील पैसे नाहीत. सरकारने यातून मार्ग काढावा आणि आम्हाला मदत करावी.- विजय अहिरे, उपेंद्रनगर, सिडको

टॅग्स :Nashikनाशिक