शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:20 IST

नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे.

नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे.गेल्या २0 ते २५ दिवसांपासून संचारबंदीमुळे रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा कसा ओढावा, असा प्रश्न या रिक्षाचालकांसमोर असून, कुटुंबाची उपासमार होत आहे. काहींचे घरांचे हप्ते थकले असून, कुणाच्या घरात किराणा संपल्यामुळे त्यासाठी पुरेसे पैसेदेखील नाहीत. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, तसेच काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेमध्ये रिक्षाचा समावेश करून आम्हाला त्यात सहभागी करून घ्यावे, असे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या रिक्षाचालकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याची खंत अनेक रिक्षाचालकांनी बोलून दाखविली.विशेषत: रिक्षाचालकांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. सर्वसामान्य रिक्षाचालकाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात यावी, अशी मागणी शहरातील रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.-------------------प्रत्येक रिक्षाचालकाचे कमीत कमी चार ते पाच जणांचे कुटुंब आहे. त्यांची सध्या उपासमार होत असून आर्थिककोंडी झाली आहे. रिक्षाचालकांनी मदत कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचा दैनंदिन खर्च, आजारपणात येणारा खर्च करायला पैसे नाहीत. घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय? महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केलेली आहे, परंतु त्याच्यात रिक्षाचालकांचा उल्लेख कोठेही नाही, याची खंत वाटते. - सचिन पगारे, पंचवटी---------------------घराचे हप्ते थकले आमच्या संसाराचा गाडा हा रिक्षावरच अवलंबून असल्याने रिक्षा चालली तर आमचा संसार चालतो. आता सर्वच व्यवसाय व्यवहार ठप्प झाल्याने पैसे आणणार कुठून, त्यात घराचे हप्ते थकले आहेत. तसेच रिक्षाचे हप्तेदेखील बाकी आहे. आम्हाला रहदारीला परवानगी मिळावी, आम्ही नियम पाळून व्यवसाय करू.- विनोद भावसार, म्हसरूळ--------------------------सरकारने मार्ग काढावा गेल्या २0 ते २५ दिवसांपासून रिक्षा वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही घरीच बसून आहोत, दुसरा कोणताच उद्योग व्यवसाय करणेदेखील शक्य नाही. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मुलाबाळांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीदेखील पैसे नाहीत. सरकारने यातून मार्ग काढावा आणि आम्हाला मदत करावी.- विजय अहिरे, उपेंद्रनगर, सिडको

टॅग्स :Nashikनाशिक