शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

येवला तालुक्यात गहू उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:39 IST

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यतच उत्पन्न निघत असल्याने गहू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हरभरा व ज्वारीच्या पिकाचीही हिच अवस्था झाली असल्याने आता शेतात कोणते पीक घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. गहू काढणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात हार्वेस्टरचा वापर करतांना दिसत आहे.नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन सध्या हार्वेस्टरमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला असून या नवीन हार्वेस्टरमध्ये गव्हाचा भुसा देखील साठवला जात असल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करीत शेती करीत आहे.दिवाळीनंतर तालुक्यातील निम्यापेक्षा जास्त गावांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शेतीला कुठून येणार अशी परिस्थिती असल्याने गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा पेरा कमी कमी होत चालला होता . यंदा समाधान कारक पाऊस पडल्याने विहिरी नाले तसेच साठवण बंधारे पाण्याने तुडुंब भरल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली होती.पेरणी नंतर पिक जोमदार आले .मात्र पिक वाढीच्या काळात वातावरणात बदल झाल्यामुळे गव्हावर मावा व करपा,तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात येऊन त्यांची वाढ खुंटली . शेतकºयांनी औषध फवारणी करून पिके जगविली .हजारो रु पये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंतच उत्पन्न निघत असल्याने गहू पिकासाठी केलेला केलेला उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने गहू उत्पादक शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक