शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

येवला तालुक्यात गहू उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:39 IST

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यतच उत्पन्न निघत असल्याने गहू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हरभरा व ज्वारीच्या पिकाचीही हिच अवस्था झाली असल्याने आता शेतात कोणते पीक घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. गहू काढणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात हार्वेस्टरचा वापर करतांना दिसत आहे.नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन सध्या हार्वेस्टरमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला असून या नवीन हार्वेस्टरमध्ये गव्हाचा भुसा देखील साठवला जात असल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करीत शेती करीत आहे.दिवाळीनंतर तालुक्यातील निम्यापेक्षा जास्त गावांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शेतीला कुठून येणार अशी परिस्थिती असल्याने गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा पेरा कमी कमी होत चालला होता . यंदा समाधान कारक पाऊस पडल्याने विहिरी नाले तसेच साठवण बंधारे पाण्याने तुडुंब भरल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली होती.पेरणी नंतर पिक जोमदार आले .मात्र पिक वाढीच्या काळात वातावरणात बदल झाल्यामुळे गव्हावर मावा व करपा,तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात येऊन त्यांची वाढ खुंटली . शेतकºयांनी औषध फवारणी करून पिके जगविली .हजारो रु पये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंतच उत्पन्न निघत असल्याने गहू पिकासाठी केलेला केलेला उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने गहू उत्पादक शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक