शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पंचनामे झाले, अनुदानाचे काय? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:00 IST

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवालशेतकरी विचारत आहेत..

ठळक मुद्दे सोेयाबीन,मका,बाजरी या पिकांना मोठमोठी कोंब फुटले. खरीप हंगामातील दुसरे महत्वाचे पिक असलेल्या सोयाबीनची पावसाने वाताहत केली आहे.नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने उत्पादनात घट झाली आहे

पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवाल शेतकº्यांच्या वतीने विचारला जात आहे.पावसाने कायम सातत्य ठेवल्याने खरीप हंगाम व पर्यायाने पिके चांगली आल्याने शेतकरी वर्ग आनंदात असतानाच ऐन कापणी,मळणीच्या दिवसातच परतीच्या परतीच्या पावसाने तेवीस दिवस हजेरी लावल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती जलमय झाली.संपूर्ण पिके गुडघाभर पाण्यात काही दिवस तरंगत राहिल्याने हि पिके पाण्यात आडवी होऊन संपूर्णता सडून गेली..शेतकरी वर्गाने या पिकांसाठी एकरी पंचवीस हजारापेक्षा जास्त खर्च केला आह. हा संपूर्ण खर्च वाया गेला आहे.या पावसाने सोंगणी,केलेली मका,सोयाबीन ,बाजरी,भुईमूग आदि पिके या पावसाच्या कचाट्यात सापडली आहेत. मका व बाजरी या पिकांचा चाराही या पावसाने सडून गेल्याने पुढील काळात जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गापुढे पुढील काळात जनावरांना वैरण कशी निर्माण करावी हि चिंता लागून आहे. येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष.डाळिंब बागा असून त्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.येवला तालुक्यात सर्वाधिक नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले जाते. या अवकाळी पावसाने कांद्यासह कांदा रोपे संपूर्णता सडून गेल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.कांदा पिका साठी शेतकऱ्यांचा एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला आहे.