शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

‘दिन’ झाला, दीनांचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 12, 2018 02:11 IST

आपल्याकडे उत्सवप्रियता अशी व इतकी काही भिनली आहे की, त्या नादात गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचेच राहून जाते. प्रासंगिक दिनविशेष साजरे करतानाही तसेच काहीसे होताना दिसते. उत्सव म्हणून ते साजरे केले जातात, त्यादिवशी कार्यक्रम-उपक्रमांची रेलचेल असते, परंतु तेवढा दिवस सरला की पुढे ‘ये रे माझ्या मागल्या’चाच प्रत्यय येतो. नुकताच साजरा झालेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्तही कार्यक्रम भरपूर झाले. परंतु विकासाच्या वाटा ज्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचू शकल्या नाहीत, त्या दीनांचे काय? असा प्रश्न काही सुटताना दिसत नाही.

आपल्याकडे उत्सवप्रियता अशी व इतकी काही भिनली आहे की, त्या नादात गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचेच राहून जाते. प्रासंगिक दिनविशेष साजरे करतानाही तसेच काहीसे होताना दिसते. उत्सव म्हणून ते साजरे केले जातात, त्यादिवशी कार्यक्रम-उपक्रमांची रेलचेल असते, परंतु तेवढा दिवस सरला की पुढे ‘ये रे माझ्या मागल्या’चाच प्रत्यय येतो. नुकताच साजरा झालेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्तही कार्यक्रम भरपूर झाले. परंतु विकासाच्या वाटा ज्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचू शकल्या नाहीत, त्या दीनांचे काय? असा प्रश्न काही सुटताना दिसत नाही.आदिवासी दिनानिमित्त सरकारी व गैरसरकारी पातळीवर विविध सोहळ्यांचे आयोजन करण्यात येऊन आदिवासी समाजाच्या सन्मानाची भाषणे झडलीत. शासनातर्फे आदिवासी गुणवंतांचा गौरव करण्यात येऊन या समाजाच्या उन्नयनाबाबतची चर्चाही झाली. एका अर्थाने किमान उत्सवी स्वरूपापुरते का होईना, विषयाकडे अगर या समाजाकडील दुर्लक्षाकडे यानिमित्ताने लक्ष वेधले गेले हे बरेच झाले म्हणायचे; परंतु वांझोट्या चर्चेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने आदिवासी विकासाचे स्वप्न कसे साकारता येईल, याचे काय? कारण, यासाठी शासनातर्फे अनेकविध योजना आखल्या जात असतात, त्यावर कोट्यवधी रुपये खर्चीही पडतात परंतु आदिवासींच्या कंबरेवरील लंगोटी काही हटताना दिसत नाही. आजही आदिवासी वाड्या-पाड्यांवर भेट दिली असता तेथील अव्यवस्था व हलाखीची परिस्थिती पाहून मन पिळवटून निघाल्याखेरीज राहत नाही. धड निवाºयाची व्यवस्था नाही की, शाळा-आरोग्याच्या सुविधा. कसला झाला विकास? असा प्रश्न त्यामुळेच निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्यामुळेच एकीकडे आदिवासी दिनानिमित्त सरकारी सोहळे होत असताना दुसरीकडे डाव्या चळवळींच्या नेतृत्वातील किसानसभेतर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढले गेलेले पाहावयास मिळाले. वनजमिनी आदिवासींच्या नावे करण्यात याव्यात या मूळ व पुरातन मागणीसह आदिवासींना नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, सरकारी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, जातीच्या दाखल्यांचे वाटप विनाविलंब व्हावे यांसारख्या मागण्या या मोर्चेकºयांनी केल्या. यातून ‘दिन’ साजरा होत असला तरी ‘दीनां’ची दशा काही सुधरू शकलेली नाही हेच स्पष्ट व्हावे. अर्थात, अनास्थेच्या या चित्रावर समाधानाची फुंकर ठरावी अशी एक बाब प्रकर्षाने नोंदविण्यासारखी ठरली आहे, ती म्हणजे लवकरच आदिवासी भाषेत क्रमिक पुस्तके येऊ घातली आहेत. आदिवासी समाजाची त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीप्रमाणेच विशेष बोलीभाषाही आहे. या बोलीभाषेचे सबलीकरण व्हावे आणि ती टिकून राहतानाच आदिवासी समाजाशी असलेली नाळ जोडली जावी याकरिता पहिली ते तिसरीसाठी आदिवासी भाषेची पुस्तके तयार करण्यात येत आहेत. राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आदिवासी विकास शिक्षण विभागाच्या माध्यमातून ११ बोलीभाषांमधील पुस्तके काढण्याचे काम हाती घेतले आहे. अशा माध्यमातून आदिवासींच्या विकासाला निश्चितच हातभार लागण्याची अपेक्षा करता यावी.

टॅग्स :GovernmentसरकारTrible Development Schemeआदिवासी विकास योजना