शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

बोगदा बंद करून फायदा काय?

By admin | Updated: January 20, 2016 23:16 IST

कृती समितीचा ‘मार्मिक’ प्रश्न : नागरिकांकडून भरणार प्रश्नावली

इंदिरानगर : दहा महिन्यांपासून बंद असलेला इंदिरानगरचा बोगदा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणेकडून केली जात असलेली चालढकल पाहता, त्यातून इंदिरानगरवासीयांची फसवणूक केली जात असल्याने हताश झालेल्या येथील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून ‘बोगदा बंद करून फायदा काय?’ असा लिखित प्रश्न व त्याला ‘मार्मिक’ पर्याय सुचविले आहेत. इंदिरानगर व गोविंदनगरच्या रहिवाशांकडून सदरचे अर्ज भरून त्या माध्यमातून काढण्यात येणारा निष्कर्ष शासनाला कळविण्यात येणार आहे. गोविंदनगर - इंदिरानगरला जोडणारा बोगदा दहा महिन्यांपासून अचानक पोलिसांनी बंद करून त्यामागे वाहतूक कोंडीचे कारण दिले आहे. बोगदा बंद झाल्याने वाहनधारकांना दोन किलोमीटरचा अधिकचा पल्ला गाठावा लागत असून, त्यामुळे वेळ व इंधनाचा चुराडा होत असल्याने हा बोगदा सुरू करावा, यासाठी वेळोवेळी राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलने केली. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या विषयाचे गांभीर्य पटवून देण्यात आले; परंतु फक्त आश्वासनांपलीकडे काहीच पदरात पडले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या इंदिरानगरवासीयांनी आता बोगदा बंद करून नेमका काय फायदा परिसरातील नागरिकांना झाला, असे प्रश्न विचारणारे पत्रक तयार करून ते नागरिकांना वाटले आहे. त्यात ‘मार्मिक’ पर्याय सुचविण्यात आले असून, या पर्यायामुळेच पोलीस प्रशासनाने बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला असावा, असा निष्कर्ष काढण्यात येणार आहे. नागरिकांनी सदरचे पत्रकावरील ‘मार्मिक’ पर्याय सुचवून त्यावर आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक टाकून त्याचे छायाचित्र ९४०५१८२९९९ या क्रमांकावर व्हॉट्स अपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)