शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भीज पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:13 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात भीज पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्यातील ४०ते ५० टक्के गावांमध्ये पावसाने दडी मारली होती. परंतु आता दोन ते तीन दिवसापासून तालुक्यातील ब-याच गावांमध्ये भीज पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला नियोजनाचा फायदा होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला : खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या

मागील हंगामाच्या कटु अनुभवाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी वर्गाने खरीप हंगामाला सुरु वात केली. मागील हंगामातील नुकसान यंदा भरुन निघेल या आशेपोटी बळीराजाने खरीपास सुरु वात केली. परंतु कोरोनामुळे सर्वच नियोजनावर पाणी फिरले. नगदी भांडवल मिळवून देणाºया टोमॅटो पिकाची रोपे मिळत नसल्याने खरीपाची सुरु वातच निराशामय झाली.परंतु तारेवरची कसरत करीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची यशस्वी लागवड केल्याने या पिकाकडून आशा उंचावल्या आहेत. तसेच टोमॅटोच्या जोडीला सोयाबीन, भात, मका, नागली, खुरसणी, भुईमूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांची पेरणी पुर्ण केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. नंतर मात्र पावसाने हुलकावणी द्यायला सुरु वात केली. खरीप हंगामातील पिके जोमाने वाढत असताना ऐनवेळी पावसाची कमतरता शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी बनली. परंतु पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील दुबार पेरणीचे संकट टळले व बळीराजांच्या चेह-यावर हसू फुलले. पिके मध्यम अवस्थेत असतांना पावसाने दडी मारली तसेच खताचा तुटवडा अशा संकटांमुळे यंदा मागील हंगामाची पुनरावृत्ती होते की काय या भीतीने शेतकरी चिंतातूर असताना पावसाने दिलासा दिला. भिज पाण्याच्या रूपाने तालुक्यात आगमन केल्याने आता बळीराजाच्या या हंगामातील जीवदान मिळालेल्या पिकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती