शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

भीज पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:13 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात भीज पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्यातील ४०ते ५० टक्के गावांमध्ये पावसाने दडी मारली होती. परंतु आता दोन ते तीन दिवसापासून तालुक्यातील ब-याच गावांमध्ये भीज पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला नियोजनाचा फायदा होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला : खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या

मागील हंगामाच्या कटु अनुभवाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी वर्गाने खरीप हंगामाला सुरु वात केली. मागील हंगामातील नुकसान यंदा भरुन निघेल या आशेपोटी बळीराजाने खरीपास सुरु वात केली. परंतु कोरोनामुळे सर्वच नियोजनावर पाणी फिरले. नगदी भांडवल मिळवून देणाºया टोमॅटो पिकाची रोपे मिळत नसल्याने खरीपाची सुरु वातच निराशामय झाली.परंतु तारेवरची कसरत करीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची यशस्वी लागवड केल्याने या पिकाकडून आशा उंचावल्या आहेत. तसेच टोमॅटोच्या जोडीला सोयाबीन, भात, मका, नागली, खुरसणी, भुईमूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांची पेरणी पुर्ण केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. नंतर मात्र पावसाने हुलकावणी द्यायला सुरु वात केली. खरीप हंगामातील पिके जोमाने वाढत असताना ऐनवेळी पावसाची कमतरता शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी बनली. परंतु पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील दुबार पेरणीचे संकट टळले व बळीराजांच्या चेह-यावर हसू फुलले. पिके मध्यम अवस्थेत असतांना पावसाने दडी मारली तसेच खताचा तुटवडा अशा संकटांमुळे यंदा मागील हंगामाची पुनरावृत्ती होते की काय या भीतीने शेतकरी चिंतातूर असताना पावसाने दिलासा दिला. भिज पाण्याच्या रूपाने तालुक्यात आगमन केल्याने आता बळीराजाच्या या हंगामातील जीवदान मिळालेल्या पिकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती