शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भीज पाऊस व ढगाळ हवामानाने मुगाला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदीलमका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.यंदा सुरु वातीपासूनच समाधानकारक पावसाने खरीपाची पिके जोमदार आली आहे. मात्र, सध्या सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून अळ्यांनी पाने खाल्याने पानांची चाळणी झाली आहे. फुलोऱ्यातील सोयाबीनची फुले तसेच शेंगा या अळ्यांनी कुरतडून टाकल्याने उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वर्ग उंच वाढलेल्या सोयाबीन पिकात आपला जीव धोक्यात घालून औषधांची फवारणी करतांना दिसत आहे.मुगाचे पिक साधारणत: दोन सव्वा दोन मिहन्यात काढणीसाठी येत असल्याने कांद्याच्या क्षेत्रात मुगाची मोठया प्रमाणात लागवड परिसरात केली जाते. यातून शेतीही चांगली राहाते तसेच शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग मुगाची लागवड करीत असतात मात्र सततच्या भीज पावसाने हे पिक खराब झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.यावर्षी सोयाबीन बियाणे खराब निघाल्याने शेतकर्?यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली असे असले तरी समाधानकारक पावसाने पिक चांगले आले आहे.दोन दिवसांपासून परिसरात पावसाने उघडीप दिली असल्याने बाजरीची कापणी तसेच कांदा लागवडीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.चौकट -सुरु वातीपासूनच समाधानकारक पाऊस पडत असल्याने पिके चांगली आली मात्र पिकांची फक्त वाढच झाली आहे. विविध किडी व रोगांमुळे सोयाबीनला शेंगा कमी आल्या असून आलेल्या शेंगाही अळींनी कुरतडल्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे.- अनिल कव्हात, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ठाणगाव.(फोटो २६ पाटोदा, २६ पाटोदा २))

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी