शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

विहिरींच्या पाण्याला इंधनाचा वास

By admin | Updated: February 8, 2017 23:59 IST

पानेवाडी : हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पात पर्यावरण सुनावणी

मनमाड : पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदूषण प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील, समन्वयक ए. जी. कुडे हे उपस्थित होते. विहिरीच्या पाण्याला इंधनाचा वास येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.येथील प्रकल्पात इथेनॉलसाठी दोन भूमिगत टाक्या तसेच एक एमएसजी टाकी अशा एकूण तीन टाक्यांचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावित टाक्यांमुळे प्रकल्पातील सध्याची इंधनाची साठवण क्षमता २००७० किलोलिटरवरून वाढून २२९३० किलोलिटर होणार आहे. या कामामुळे निसर्ग व पर्यावरणाची काही हानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिपत्याखाली प्रकल्पात पर्यावरण विषयक लोकसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. चैतन्य साठे यांनी परिसरातील जमीन, माती, पाणी, हवा, पशू, पक्षी आदि पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास करून तयार केलेले प्रास्ताविक सादर केले. सर्व मूल्यांकन केल्यानंतर या उपक्रमामुळे पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नसल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकांनी विविध सूचना यावेळी मांडल्या. माजी आमदार संजय पवार यांनी परिसरातील विहिरींच्या पाण्याला इंधनाचा वास येत असल्याचा तसेच कंपनी परिसरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. साधना गायकवाड, विक्रम चव्हाण, दत्तू सोनवणे, अंकुश कातकाडे, संजय निकम, दत्तू शिंदे, शिवाजी ढगे आदि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सूचना मांडल्या. प्रकल्प व्यवस्थापक नितीन जोशी यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी कंपनीला दिल्या. (वार्ताहर)