शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या भुत्तो कुटुंबियांचा इतिहास जागविते नाशिकमधील पुरातन बारव

By azhar.sheikh | Updated: May 14, 2018 16:55 IST

नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे.

ठळक मुद्देझुल्फिकार भुत्तो यांचे वडील शाहनवाज भुत्तो हे गुजरात्या जुनागड संस्थानाचे दिवाण दुष्काळ पडला तेव्हा या बारवमध्ये पाण्याची पातळी चांगल्याप्रकारे टिकून होतीइंदोरे गावात आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी (कब्रस्तान) नजरेस पडतेइंदोरे या लहानशा गावी भुत्तो यांच्या जमिनी होत्या

नाशिक : पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख व दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांचा थेट संबंध नाशिकशी फाळणीपुर्व आल्याच्या खाणाखुणा आहे. उच्चशिक्षित झुल्फिकार हे इंग्रज लष्करामध्ये नोकरीला होते. त्यावेळी ते नाशिकमध्ये देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे या लहानशा गावी भुत्तो यांच्या जमिनी होत्या. या गावाच्या मातीमध्ये भुत्तो कुटुंबियांचा इतिहास दडलेला आहे. गावातील जुनी बारव जी भुत्तो यांनी फाळणीच्या वेळी गावाला बक्षीस म्हणून दिली ती बारव इतिहास जागविते. गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे या ज्येष्ठांनाही त्यावेळीच्या आठवणी आजही लख्ख आठवतात.

नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे. झुल्फिकार भुत्तो यांचे वडील शाहनवाज भुत्तो हे गुजरात्या जुनागड संस्थानाचे दिवाण होते. त्यावेळी त्यांच्याकडे परंपरागत नाशिक भागातील काही जहागिऱ्या होत्या. इंदोरे गावातही त्यांची दहा ते पंधरा एकर जमीन होती, ती त्यांनी कुळांना कसण्यासाठी दिल्याचे आजही दरगोडे हे आत्मविश्वासाने सांगतात.

इंदोरे गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी (कब्रस्तान) नजरेस पडते. या दफनभूमीमधील काही दगडी कबरी झाडाझुडुपांमध्ये असल्याने लक्षात येत नाही. हे कब्रस्तान भुत्तो यांच्या खानदानाचे होते, असे दरगोडे व मोहम्मद हनिफ सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भुत्तो यांनी शेतसारा गोळा करण्यासाठी रानडे नावाच्या वकिलांची नियुक्ती त्याकाळात केली होती हेदेखील दरगोडे यांना चांगले आठवते. रानडे वकिलांशी त्यांचा चांगला परिचय त्यावेळी आला.

https://youtu.be/xh-M0HKywt4

बारव दिली गावाला भेटभारताच्या फाळणीनंतर भुत्तो हे पाकिस्तानात निघून गेले त्यावेळी त्यांनी त्यांच्या इंदोरे गावामधील कुळाच्या जमिनींना लागून असलेली मोठी जुनी बारव गावाला बक्षीस म्हणून दिली. या बारववर कोणाचाही  हक्क नसून ती गावाची जुनी बारव म्हणून आजही ओळखली जाते. या बारवमुळे या गावाचे गावपण टिकून राहिले असे दरगोडे सांगतात. कारण दुष्काळ पडला तेव्हा या बारवमध्ये पाण्याची पातळी चांगल्याप्रकारे टिकून होती. यामुळे गावातील जेमतेम अडीचशे ते पाचशे लोकांची तहान या विहिरीने त्यावेळी भागविली. गावक-यांचे पशुधनही या विहिरीवर आपली तहान भागवत आंघोळ करत असे बारवमध्ये उत्तरण्यासाठी पाय-यांचा जीना ही बांधलेला होता. कालंतराने गावक-यांनी बारवमध्ये जाण्याची ही वाट बुझविल्याचे दरगोडे म्हणाले. त्यानंतर परिस्थिती बदलली गाव बागायती झाले. आजही बारवच्या तळाला पाण्याची पातळी टिकून आहे. जर त्यावेळी ही बारव इंदोरेवासियांना मिळाली नसती तर कदाचित मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले असते, असे दरगोडे म्हणाले.

गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे

टॅग्स :NashikनाशिकPakistanपाकिस्तानBenazir Bhuttoबेनझीर भुत्तो