शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान निरीक्षकाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:56 IST

सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी महापालिकेच्या सिडको उद्यान विभागात पन्नासहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम ...

सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी महापालिकेच्या सिडको उद्यान विभागात पन्नासहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम तीन महिला कर्मचाºयांसह अवघे १४ कर्मचारी करीत आहेत. तर चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान विभागाची प्रमुख जबाबदारी असलेल्या उद्यान निरीक्षकाचा भार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सिडको प्रभागात एकूण सहा प्रभागमिळून २४ नगरसेवक आहेत. सहा प्रभागांचा समावेश असलेल्या एवढ्या मोठ्या भागात मनपाची एकूण ८० हून अधिक उद्याने असून यातील सुमारे ५० उद्यानांची खासगी ठेकेदारामार्फत (वरवर) देखभाल करण्यात येते. तरी अजून ३० हून अधिक उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी ही मनपाच्या कर्मचाºयांकडे आहे. या कर्मचाºयांना उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजरगवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर, रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे, वाहतूक बेट व दुभाजक स्वच्छता करणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने करणे गरजेचे असतानाही या विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. उद्यानांची देखभाल करण्यासाठी ५० हून अधिक कर्मचारी मनपाकडे असणे गरजेचे असताना यासाठी अवघे १४ कर्मचारी हे काम करीत असल्याने त्यांच्याकडून हे कामकाज पूर्ण होत नसल्याचे सिडकोतील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सिडकोतील बहुतांशी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यामुळे पथदीप झाकले गेले असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.