शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’संत सावता माळी अभियान : कृषी पणन मंडळ, पांजरापोळचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:43 IST

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.

ठळक मुद्देदर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.येत्या शुक्रवारपासून (दि. १) या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बाजार भरविला जाणार आहे. या बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात येणार नाही, तर शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी दाखल होणार असल्याचा दावा कृषी पणन मंडळाने केला आहे. कृषी पणन मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी थेट ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यासाठी मोफत जागा पांजरापोळ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. विक्रीसाठी येणाºया शेतकºयांकडून कुठल्याही प्रकारे जागेचे शुल्क अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नसल्याचे पांजरापोळ संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतमालाचे हाताळणी दरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. ग्राहकांना मिळणार दर्जेदार शेतमालशेतकरी थेट शेतमाल बांधावरून बाजारात विक्रीसाठी आणणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शेतमाल मिळणार आहे. या बाजारात थेट शेतकºयांमार्फत विक्री होणार असल्यामुळे नागरिकांना वाजवी दरात चांगला भाजीपाला, फळभाज्या उपलब्ध होणार आहेत. किरकोळ, घाऊक विक्रेते, आडतदार, मध्यस्थ नसल्यामुळे शेतमालाच्या किमतीही अव्वाच्या सव्वा राहणार नसल्याचे कृषी पणन मंडळाचे म्हणणे आहे.