शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

दर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’संत सावता माळी अभियान : कृषी पणन मंडळ, पांजरापोळचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:43 IST

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.

ठळक मुद्देदर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.येत्या शुक्रवारपासून (दि. १) या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बाजार भरविला जाणार आहे. या बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात येणार नाही, तर शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी दाखल होणार असल्याचा दावा कृषी पणन मंडळाने केला आहे. कृषी पणन मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी थेट ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यासाठी मोफत जागा पांजरापोळ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. विक्रीसाठी येणाºया शेतकºयांकडून कुठल्याही प्रकारे जागेचे शुल्क अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नसल्याचे पांजरापोळ संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतमालाचे हाताळणी दरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. ग्राहकांना मिळणार दर्जेदार शेतमालशेतकरी थेट शेतमाल बांधावरून बाजारात विक्रीसाठी आणणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शेतमाल मिळणार आहे. या बाजारात थेट शेतकºयांमार्फत विक्री होणार असल्यामुळे नागरिकांना वाजवी दरात चांगला भाजीपाला, फळभाज्या उपलब्ध होणार आहेत. किरकोळ, घाऊक विक्रेते, आडतदार, मध्यस्थ नसल्यामुळे शेतमालाच्या किमतीही अव्वाच्या सव्वा राहणार नसल्याचे कृषी पणन मंडळाचे म्हणणे आहे.