शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

दर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’संत सावता माळी अभियान : कृषी पणन मंडळ, पांजरापोळचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:43 IST

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.

ठळक मुद्देदर शुक्रवारी ‘शेतकºयांचा आठवडे बाजार’पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली

नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल आता उपलब्ध होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांनी शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरणार आहे. यासाठी पांजरापोळ संस्थेने मोफत जागा शेतकºयांना उपलब्ध क रून दिली आहे.येत्या शुक्रवारपासून (दि. १) या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बाजार भरविला जाणार आहे. या बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात येणार नाही, तर शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी दाखल होणार असल्याचा दावा कृषी पणन मंडळाने केला आहे. कृषी पणन मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी थेट ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यासाठी मोफत जागा पांजरापोळ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. विक्रीसाठी येणाºया शेतकºयांकडून कुठल्याही प्रकारे जागेचे शुल्क अथवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नसल्याचे पांजरापोळ संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतमालाचे हाताळणी दरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. ग्राहकांना मिळणार दर्जेदार शेतमालशेतकरी थेट शेतमाल बांधावरून बाजारात विक्रीसाठी आणणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शेतमाल मिळणार आहे. या बाजारात थेट शेतकºयांमार्फत विक्री होणार असल्यामुळे नागरिकांना वाजवी दरात चांगला भाजीपाला, फळभाज्या उपलब्ध होणार आहेत. किरकोळ, घाऊक विक्रेते, आडतदार, मध्यस्थ नसल्यामुळे शेतमालाच्या किमतीही अव्वाच्या सव्वा राहणार नसल्याचे कृषी पणन मंडळाचे म्हणणे आहे.