शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नायगाव येथे आठवडे बाजाराला सुरुवात

By admin | Updated: September 26, 2016 23:20 IST

उत्साह : ४० वर्षांनंतर ग्रामस्थांनी केली खरेदीसाठी गर्दी

दत्ता दिघोळे ल्ल नायगावबटाटे वीस रुपये.. मिरची दहा रुपये.. भेंडी पंधरा रुपये.. कोणताही माल दहा रुपये.. आलेल्या दुकानदारांचे स्वागत.. ग्राहकांचे अभिनंदन.. या आणि अशा अनेक सुरांच्या आवाजाने उजाडला नायगावकरांचा शनिवार. निमित्त होते तब्बल ४० वर्षांनंतर सुरू झालेल्या आठवडे बाजाराच्या शुभारंभाचे !गेल्या महिनाभरापासून नायगाव व परिसरातील ग्रामस्थांना आठवडे बाजार सुरू होणाऱ्या शनिवारची उत्सुकता होती. ग्रामपंचायत प्रशासनाला दुकानांची गर्दी व ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल काय याची उत्सकता होती. शनिवारी आठवडे बाजार भरला आणि विविध भागातून आलेल्या दुकानदारांनी व गाव परिसरातील ग्राहकांनी या आठवडे बाजाराला दिलेला प्रतिसाद पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून लागला. सकाळी ७ वाजेपासूनच बसस्थानक परिसरात एक एक करत अवघ्या तास-दीड तासात संपूर्ण परिसर विविध भाजीपाला, खाऊ, स्टोव्ह दुरुस्ती, कृषिपंप-गॅस शेगडी दुरुस्ती, खारी टोस्ट अशा विविध दुकानांनी संपूर्ण परिसर ग्राहकांच्या प्रतिसादाने गर्दीने फुलून गेला होता.गेल्या अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर नायगाव आठवडे बाजाराने फुलून गेला होता. गाव व परिसरातील नागरिकांनी याठिकाणी खरेदीसाठी व आठवडे बाजार बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी येणाऱ्या दुकानदारांना जागेची व्यवस्था करून देताना दिसत होते. पहिल्याच बाजारास दुकानदार व ग्राहकांचा प्रतिसाद बघता हा बाजार येत्या काही दिवसांत चांगलाच फुलेल, असा अंदाज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, बाळासाहेब केदार, दिलीप पवार, लक्ष्मण भास्कर, धनलक्ष्मीचे चिंधू डोमाडे, बाळू कापडी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, जाखोरी, सोनगिरी, जोगलटेंभी, निफाड तालुक्यातील पिंपळगाव, सावळी, तळवाडे, महाजनपूर आदि गावांच्या लोकांना नायगाव हे इतर आठवडे बाजारासाठी जवळचे ठिकाण असल्याने या आठवडे बाजाराला प्रत्येक शनिवारी चांगला प्रतिसाद लाभेल, असा अंदाज आहे. परिसरात नायगावच्या आठवडे बाजाराचीच चर्चा रंगली आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून खरेदीशुभारंभाचा बाजार असल्याने बाहेरून आलेल्या दुकानदारांची खरेदी-विक्री झाली पाहिजे या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांकडे विविध मालाची खरेदी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड हे ध्वनिक्षेपकावरून दुकानदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. नायगाव परिसर तसा शेतीवरच अवलंबून आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकत असला तरी बाजार सुरू राहण्यासाठी आज अनेक शेतकऱ्यांनी गरज नसतानाही भाजीपाला खरेदी केली, तर अनेकांनी खाऊच्या दुकानात भारतीय बैठक मारत गरमागरम जिलेबी व भेळ खाण्याचा आनंद लुटला.