शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव शहरातील आठवडे बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:22 IST

मालेगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता मूलभूत सुविधांचा मोठा वानवा आहे. अनेक पायाभूत गरजा पूर्ण न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : प्रत्येक प्रभागात स्मार्ट फळे व भाजीपाला मार्केटची गरज

मालेगाव : मालेगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता मूलभूत सुविधांचा मोठा वानवा आहे. अनेक पायाभूत गरजा पूर्ण न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मालेगाव शहरात तसे मार्केट नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. जे मार्केट उपलब्ध आहे, त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. मार्केट, गांधी मार्केट, मच्छी बाजार, सोमवार बाजार ही मोक्याची बाजाराची ठिकाणे आहेत. त्या त्या परिसराच्या दृष्टीने अतिशय तोकडी आहेत. कमी जागा व अतिक्रमण ठिकाणावर असलेल्या बाजारांमुळे महिलांना दाटीवाटीची धक्के सहन करावे लागतात. मालेगाव शहराची गरज ओळखून खुल्या जागेवर प्रत्येक प्रभागात मार्केट व बाजारासाठी ओटे होण्याची गरज आहे. अनेक भागातील अस्वच्छता व बकालपणा ही बाजारांच्या ठिकाणांहून सुटलेली नाही. सोमवार बाजार भागातील नव्याने बांधलेल्या शॉपिंग गाळे व बाजार ओट्यावर जनावरांचा व डुकरांचा मुक्त संचार आहे तर याच ठिकाणी भरदिवसा मद्यपी मद्य पीत बसतात व गाळे नसून ते नागरिकांचे लघुशंका करण्याचे ठिकाण बनले आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. यामुळे येथील बाजाराचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. सोमवार बाजारात महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात गाळे व भाजी विक्रेत्यांसाठी बाजार ओटे बांधले आहेत. मात्र लिलाव व न्यायालयीन वादात हा बाजार अडकला आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून बाजार तयार असुनही त्याचा उपयोग झालेला नाही. कॅम्प भागातील विक्रेते सोमवार बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान थाटतात. येथे घाणीचे साम्राज्य आहे. येथे तालुक्यातील डाबली, अजंग, वडगाव, पिंपळगाव, दाभाडी, चिखलओहोळ, खडकी, सवंदगाव, रावळगाव आदी ठिकाणाहून भाजीपाला रोज विक्रीसाठी येतो. ताज्या व टवटवीत भाजीपाल्यांची सोमवार बाजार मार्केटची ओळख आहे. सध्या बाजार ओट्यांचा होणारा गैरवापर, झालेली दुरावस्था, जनावरे व डुकरांचा वावर, रिकामटेकड्या नागरिकांचा पत्त्यांचा डाव यामुळे महापालिकेचा या ओट्यांवर झालेला खर्च अनाठायी आहे. सरदार मार्केट, गांधी मार्केट, मच्छी बाजार येथील स्थितीही काही वेगळी नाही. मार्केट व बाजारांच्या ठिकाणांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर लहान निकेते व हॉकर्स अतिक्रमण करतात. भाजीपाला विक्रेत्यांकडून मनपा सक्तीचा कर घेते. परंतु त्यांना सुविधा देत नाही. त्यामुळेच भाजीपाला व्यावसायिक आडमुठेपणाने रस्त्यावर ठाण मांडतात. महापालिकेने बांधलेली गाळे व बाजार ओटे. भाजीपाल्यासाठी छोटे आहेत. या परिसरात पानाच्या सुविधेसह स्वच्छतागृहाची गरज असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. रामसेतू भागातील भाजीबाजार शंभर वर्षांपूर्वीचा आहे. त्याचे नूतनीकरण झाले नाही. शासनाच्या या जागेवर पालिकेने बाजार विकसीत केला आहे. रामसेतू वरील बाजाराचे नुतनीकरण होणे गरजेचे आहे. महापालिकेने नियोजन केल्यास या भागाचा कायापालट होईल. तसेच भाजीपाला विक्रेत्यांची देखील सोय होणार आहे.शहरालगतच्या अनेक खेड्यातून भाजीपाला घेऊन शेतकरी येतात, मात्र भाजी बाजारात इतर शहराप्रमाणे चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर दुकाने थाटतात स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना रोज सकाळी चांगला भाजीपाला मिळावा, यासाठी या भाजी विक्रेत्यांना प्रत्येक मार्केटमध्ये सुविधायुक्त जागा अथवा गाळा उपलब्ध व्हावा. मोकाट जनावरे थेट मार्केटमध्ये शिरतात यामुळे महिलावर्गांमध्ये भीती निर्माण होते.- विद्या बच्छाव, मालेगावगर्दी व वर्दळीच्या ठिकाणी भाजीपाला व किरकोळ विक्रेते असतात. यामुळे बाजारात आलेल्या महिलांना सातत्याने त्रास होते. कॅम्प भागातील अतिक्र मण व बाजारातल्या दाटीचा फायदा घेत अनेकदा चोरीचे प्रकारदेखील घडले आहेत. महानगरपालिकेने प्रत्येक भागात मार्केट विकसित करावे.- अर्चना गरुड, मालेगाव कॅम्प

टॅग्स :Healthआरोग्य