शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

बुधवारपासून पहायला मिळणार अधिकमासाची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:29 IST

दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे.

नाशिक : दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे.  सासरी असणाऱ्या लेक-जावयास बोलावून त्यांना अनारसे, बत्तासे, आंबे, इच्छेनुसार पैसे, सोने-चांदी, तांब्या-पितळाची भांडी, कपडे, उपकरणे आदी देऊन अधिकमासाचे पुण्य मिळवण्यावर भर दिला जातो. यामुळे तुळशीच्या लग्नानंतर सुरू झालेली लग्नसराई संपताच नव्या जावयांबरोबरच जुन्या जावयांनाही गमतीने ‘अच्छे दिवस’ येणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (दि.१५) अमावस्या संपल्यानंतर अधिकमास सुरू होणार आहे.  नोकरी धंद्यासह आपापल्या व्यापात मग्न असणाºया जावयांना आता सासूरवाडीच्या निमंत्रणाची आस लागली आहे. सध्या उन्हाचा कडाका पहायला मिळतो आहे. शहर व ग्रामीण भागात सुट्या, प्रवास, लग्नकार्य, शेताची कामे अशा अनेक गोष्टींचा एकाचवेळी ताण पहायला मिळत आहे. त्यात आता अधिकमासाची भर पडणार आहे. हा अधिक महिना फलदायी मानला जात असल्याने या काळात तीर्थस्थळावर दीपदान, पूजा, अर्चा, ब्राह्मणपूजा, दानधर्म, धार्मिक उपक्रम यांनाही महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अधिकमासास लागणाºया वस्तू, पदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे, तर घरोघरी लेक, जावयाला, भाच्यांना काय भेट द्यायची यावर चर्चा ऐकायला मिळत आहे. सोने-चांदीच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट््स याबरोबरच गृहोपयोगी वस्तू देण्याचेही नियोजन करताना दिसत आहे. याशिवाय अधिकमासात लेक जावयाला, त्याच्या कुटुंबीयांना बोलावून गोडाधोडाचे जेवणही दिले जाते.अधिकमास म्हणजे काय?ऋतू सौरमासाप्रमाणे ठरलेले असतात. चांद्रवर्षाचे ३५४, तर सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात. म्हणजे या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे तसेच चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ बसावा म्हणून एक महिना अधिक धरावा, असे सांगितले जाते. याला पुरुषोत्तम मास, मलमास असेही म्हटले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यास इच्छित फळ प्राप्त होत असल्याचीही आख्यायिका आहे. या महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला जातोे. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांना सन्मानपूर्वक बोलावून ३३ अनारसे दिले जातात. अनारसे नसतील, तर ३३ बत्तासे , ३३ म्हैसूरपाक वड्या, घिवर, ३३ नारळ, ३३ सुपाºया किंवा ३३ आंबे अथवा इतर कोणतेही ३३ फळे दिले तरी चालतात. चांदी किंवा तांब्याच्या ताटात दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना दिले जाते.

टॅग्स :Nashikनाशिक