शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

समृद्धीच्या पैशांवरून भाऊबंदकी! हरकतींचा पाऊस : भांडणे सोडवताना अधिकाºयांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:00 IST

नाशिक : बाजारभावापेक्षा पाच पट अधिक रकमेचा जमिनीचा मोबदला मिळत असल्याचे पाहून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकºयांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, जमिनीच्या मिळणाºया मोबदल्यावरून आता घराघरांत भांडणे सुरू झाली आहेत.

ठळक मुद्दे ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ मोबदल्याच्या वाट्याहिश्यावरून वाद

नाशिक : बाजारभावापेक्षा पाच पट अधिक रकमेचा जमिनीचा मोबदला मिळत असल्याचे पाहून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकºयांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, जमिनीच्या मिळणाºया मोबदल्यावरून आता घराघरांत भांडणे सुरू झाली आहेत. एकेकाळी पडिक म्हणून दुर्लक्ष केलेल्या जमिनीवर आपला मालकी हक्क सांगण्यात नातेसंबंधातील एकापेक्षा अधिक व्यक्ती ऐनवेळी समोर उभे ठाकत असल्याने त्यांच्यातील पैशांचे वाद पाहून अधिकाºयांना ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ या गाण्याची आठवण येऊ लागली आहे.जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून समृद्धी महामार्ग जात असून, जवळपास १२०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करून प्रत्येक गटधारकास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याबरोबरच जमिनीचे व तेथील मालमत्तेचे मूल्यांकन करून मिळणाºया मोबदल्याची रक्कमही जाहीर केली आहे. नेमकी हीच बाब घराघरांतील भाऊबंदकीसाठी डोकेदुखी ठरली असून, ज्या ज्या जागामालकांनी समृद्धीसाठी जमीन देण्यासाठी तयारी दर्शविली अशांच्या सातबारा उताºयावर नाव असलेल्या सर्वांचीच संमती आणण्याचे बंधनकारक करण्यात आल्यावर मिळणाºया मोबदल्याच्या वाट्याहिश्यावरून वाद सुरू झाले आहेत. पुणे, मुंबई यांसारख्या बाहेरगावी अनेक वर्षे नोकरीला असलेल्या व कधीही जमिनीकडे ढुंकूनही न पाहिलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी आता संमती देण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली आहे, तर लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणींनीदेखील वडिलोपार्जित जमिनीवर आता हक्क सांगण्यात सुरुवात केली आहे. गेली ३० ते ४० वर्षे निव्वळ तोंडी बोलीवर वाटणी झालेल्या जमिनीच्या मालकी हक्कावरूनही समृद्धीवरून पुन्हा वाटणी करण्यापर्यंत वाद पोहोचले आहेत. गट एकत्रिकरणात समजोत्यानुसार वाटून घेतलेल्या जमिनी इतक्या वर्षी कसल्यानंतर निव्वळ समृद्धीत संपादन होणार असल्याचे पाहून मूळ मालकांनी गट एकत्रिकरणाचा समझोताही नाकारला आहे. गावागावात व गटागटात जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या वादामुळे निफाड व इगतपुरी प्रांत अधिकाºयांकडे शेकडोच्या संख्येने जमीन मालकांच्या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात भावाने भावाविरुद्ध, मुलाने वडिलांविरुद्ध, मुलीने भाऊ व वडिलांविरुद्ध, काकाने चुलत्याविरुद्ध, आईने मुलाविरुद्ध मोठ्या संख्येने हरकती दाखल करून जमिनीच्या संपादनात खोडा घातला आहे. त्यामुळे अशा हरकतींची सुनावणी घेताना समोर येणाºया बाबी पाहून अधिकारीही चकीत झाले आहेत.निव्वळ दिवाळीत साडी घेतली नाही व मेहुण्याचा मानपान केला नाही म्हणून रुसून बसलेल्या बहिणीची समजूत काढताना अधिकाºयांच्याही नाकीनव आले असून, समृद्धीत जाणाºया जागेचा समान मोबदला मिळावा तसेच उर्वरित जमिनीची समान वाटणी करून द्यावी, अशी मागणी करणाºया कुटुंबात समझोता घडवून आणण्यासाठी समुपदेशन करण्याचेही काम करावे लागत आहे.ना बाप बडा, ना बेटा....मुंबईत बड्या पगारावर नोकरीस असलेल्या मुलाने अनेक वर्षे जमिनीकडे ढुंकूनही पाहिले नाही. आई-वडील लहान भावाकडे राहतात व तेथेच शेती करून गुजराण करणाºया कुटुंबातील मोठ्या मुलाने फार वर्षांपूर्वीच शेती नको म्हणून जाहीर केल्याने आता समृद्धीत पैसे मिळणार असल्याचे पाहून थेट आई, वडिलांच्या विरोधातच हरकत घेतली. जमिनीचे तीन हिस्से करून मिळणाºया मोबदल्याचा तिसरा हिस्सा मिळावा म्हणून आग्रह धरला. अखेर आई, वडील, मोठा मुलगा व लहान मुलगा असे चार हिस्से करण्यात आल्यावर मोठ्या मुलाला त्याच्या हिश्श्याची रक्कम द्यावी लागल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडल्याने ‘ना बाप बडा, ना बेटा, भय्या सबसे बडा रुपय्या’ याची प्रचिती अधिकाºयांना आली.