शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

२८५ लोकांची शस्रे जप्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:45 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असून, पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरात कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९३ गुन्हेगारांना शहरास जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ९ संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतची शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचार फेऱ्या, प्रचार सभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास २८५ परवानाधारक व्यक्तींची शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या निर्देशानुसार शस्रे जप्तीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गरज वाटल्यास उर्वरित एक हजार लोकांमधूनदेखील शस्रे जप्त केली जाऊ शकतात. बेकायदेशीरपणे शस्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.२०१४च्या निवडणुकीत आठ गुन्हे दाखल२०१४च्या विधानसभा निवडणुकीत हाणामारी, आचारसंहिता भंग, निवडणूक रिंगणातील उमदेवारांचा अवमान आदी कारणांवरून पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये जवळपास सर्वच संशयित राजकीय पक्षांशी संबंधित होते. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग खपवून घेतला जाणार नसून जिल्हाधिकाºयांनीदेखील तसे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय