शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे

By श्याम बागुल | Updated: July 20, 2019 18:10 IST

नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : जनआशीर्वाद यात्रेचे आगमनतुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने अनेक प्रश्नांवर लढा दिला, आंदोलने केली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळू शकले, असा दावा करून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली असून, महाराष्टÑात सुजलाम् सुफलाम् व न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, तुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्यात किती किलोमीटरचा प्रवास व किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, आवाज उठविले अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.महाराष्टÑावर भगवा फडकविण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच, तुमच्या-आमच्या न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपली जनआशीर्वाद यात्रा असून, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे असे स्पष्टीकरण देऊन आदित्य ठाकरे यांनी उपस्थिताना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन करताच, सर्वांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv Senaशिवसेना