शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे

By श्याम बागुल | Updated: July 20, 2019 18:10 IST

नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : जनआशीर्वाद यात्रेचे आगमनतुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने अनेक प्रश्नांवर लढा दिला, आंदोलने केली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळू शकले, असा दावा करून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली असून, महाराष्टÑात सुजलाम् सुफलाम् व न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, तुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्यात किती किलोमीटरचा प्रवास व किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, आवाज उठविले अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.महाराष्टÑावर भगवा फडकविण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच, तुमच्या-आमच्या न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपली जनआशीर्वाद यात्रा असून, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे असे स्पष्टीकरण देऊन आदित्य ठाकरे यांनी उपस्थिताना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन करताच, सर्वांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv Senaशिवसेना