शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे

By श्याम बागुल | Updated: July 20, 2019 18:10 IST

नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : जनआशीर्वाद यात्रेचे आगमनतुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने अनेक प्रश्नांवर लढा दिला, आंदोलने केली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळू शकले, असा दावा करून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली असून, महाराष्टÑात सुजलाम् सुफलाम् व न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, तुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्यात किती किलोमीटरचा प्रवास व किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, आवाज उठविले अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.महाराष्टÑावर भगवा फडकविण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच, तुमच्या-आमच्या न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपली जनआशीर्वाद यात्रा असून, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे असे स्पष्टीकरण देऊन आदित्य ठाकरे यांनी उपस्थिताना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन करताच, सर्वांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv Senaशिवसेना