शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

भंगार बाजार ‘आम्ही’च हटविला!

By admin | Updated: January 21, 2017 22:44 IST

सेना-मनसेचा दावा : श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू

नाशिक : शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार भुईसपाट करण्याची कामगिरी महापालिका प्रशासनाने यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भंगार बाजारावरील कारवाईचेही श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भंगार बाजार हटविण्याचे संपूर्ण श्रेय हे आमचेच असल्याचा दावा शिवसेना करत असताना मनसेनेही आमच्या सत्ताकाळातच ही कारवाई होऊ शकल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रचारात भंगार बाजाराचाही मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुंचाळे शिवार आणि अंबड-लिंकरोडवर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे वसलेला भंगार बाजार हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली जात होती. १९९५ च्या सुमारास भंगार बाजार विरोधी कृती समितीही स्थापन होऊन चळवळ अधिक तीव्र करण्यात आली होती. मात्र, सदर प्रकरण हे न्यायप्रवीष्ट झाल्याने महापालिकेकडून भंगार बाजार हटविण्याची कारवाई होत नव्हती. दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत भंगार बाजारविरोधात लढा पुकारला. त्यात यश येत न्यायालयाने भंगार बाजार उठविण्याचे निर्देश महापालिकेला दिले. मात्र, महापालिका प्रशासकीय पातळीवर भंगार बाजार हटविण्याबाबत विलंब लावला गेल्याने आयुक्तांविरोधी अवमानना याचिका दाखल झाली. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार भंगार बाजार भुईसपाट करण्याचा निर्धार केला आणि ७ ते ९ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीतच भंगार बाजारावरील कारवाई पूर्ण केली. या कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले.  आता भंगार बाजारावरील कारवाईचे श्रेय घेण्यासाठी प्रामुख्याने, शिवसेना व मनसे यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही मनसेच्या सत्ताकाळातच झाल्याचे सांगितले, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही भंगार बाजार हटविण्याची कारवाई मनसेनेच केल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने तर आधीपासूनच भंगार बाजार हटविण्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भंगार बाजार हासुद्धा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)