शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नांदगाव नको, नाशिकच हवे आम्हाला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST

नांदगाव : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरून काम करण्याची सवलत मिळाल्याने दररोज नाशिक व अन्य ठिकाणाहून नोकरीनिमित्त येणाऱ्यांची सोय झाली. ...

नांदगाव : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे घरून काम करण्याची सवलत मिळाल्याने दररोज नाशिक व अन्य ठिकाणाहून नोकरीनिमित्त येणाऱ्यांची सोय झाली. मात्र ही सवय अंगवळणी पडल्याने व घरी राहून काम करण्याचे फायदे दिसत असल्याने आपली बदली नाशिक येथेच व्हावी यासाठी अनेक जण सध्या धडपड करत असल्याचे चित्र आहे.

वर्षानुवर्षे नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास न राहता अपडाऊन करून घर भाडे भत्ता खिशात घालण्याच्या प्रवृत्तीला कोरोना काळ अधिक आर्थिक प्राप्ती करून देणारा ठरला. आधी प्रवासाचा व प्रवासातल्या चहापाण्याचा खर्च होता. घरून काम करण्याच्या सवलतीमुळे तोही वाचला. कोरोना काळात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडताना नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही, म्हणून सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत उपासनी यांनी आठ महिने पगार घेतला नाही. असे उदाहरण घर भाडे भत्त्याबद्दल घडल्याचे ऐकिवात नाही.

येथील शासकीय कार्यालये, खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळा, महाविद्यालये व इतर कामांसाठी सुमारे ४०० ते ५०० च्या संख्येने अपडाऊन करणारे कोरोना काळापूर्वी क्रियाशील होते. रेल्वेने येणे जाणे, आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने सर्व आनंदी होते. परंतु कोरोना काळात घरात बसून नोकरी करण्याची सवय एवढी रुजली की, अपडाऊन करणेसुद्धा त्रासाचे व्हायला लागले. अनेक आस्थापनांमध्ये नांदगाव नको नाशिकच हवे अशी मागणी जोरात आहे. कोरोना काळात रेल्वेच्या प्रवासी गाड्या बंद असल्याने जाणे अगदी आवश्यक असले तर वर्गणी करून समूहाने एकाच खासगी गाडीने येण्याची प्रथा पडली.

नाशिक येथे बदली व्हावी अशी मागणी मान्य करण्यात आली नाही म्हणून येथील पदाधिकारी वाईट झाले. आडमुठेपणा करून नियमानुसारच काम करणार अशी भूमिका घेतली गेली. त्यात कामाचे तीन तेरा वाजले तरी पर्वा नाही... येथपर्यंत प्रकरणे हातघाईला आली.

इन्फो

ऑनलाइनचे फायदे-तोटे

ऑनलाईनमुळे गेल्या दीड वर्षात अनेक तोटे झाले. त्याबरोबर शैक्षणिक नुकसानीचा अंदाज बांधणेदेखील कठीण झाले आहे. जी स्थिती नाशिकहून अपडाऊन करणाऱ्यांची आहे तीच तालुक्याच्या ठिकाणावरून खेड्यातील कामांवर जाणाऱ्या वर्गाची झाली आहे. कोरोनाचा क्रियाशील काळ आणि कोरोनाला निरोप देण्याचा काळ यातला बदल्यांचा संघर्ष पृष्ठभागावर दिसून येत नसला तरी त्याने नोकरी करणाऱ्यांची मानसिकता आणि जीवनातल्या काही गोष्टीवर परिणाम नक्कीच केला असल्याचे चित्र आहे.