शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खड्डे, चिखलातून काढावा लागतो मार्ग

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

खड्डे, चिखलातून काढावा लागतो मार्ग

 

नाशिक : रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेले खड्ड्यांचे साम्राज्य, चिखलमय रस्ते, बंद पथदीप, तुंबलेल्या गटारी आणि कुजलेला कचरा ही समस्या आहे प्रभाग क्र मांक ६ मधील विविध परिसराचे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, प्रभागाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील स्वामी विवेकानंदनगर, अश्वमेधनगर, कर्णानगर, पवार मळा, गजवक्रनगर आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर परिसरातील बहुसंख्य अंतर्गत रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे तयार होतात. आहे त्या रस्त्यांवर मुरूम नसल्यामुळे खड्ड्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण होईल तेव्हा होईल; मात्र सद्यस्थितीत पालिकेने अशा रस्त्यांवर मुरूम तरी टाकायला हवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. परिसरातील अनेक रस्त्यांवर केवळ विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत; मात्र त्यांना दिवे न बसविल्याने परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. आहे तेथील पथदीपही नेहमीच बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे कचरा कुजला असून, दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारींचे चेंबरही तुंबल्याने रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी काही ठरावीक परिसराचाच विकास केला असून, काही भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)