शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

डाळींबबागा पाण्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 9, 2016 22:39 IST

डाळींबबागा पाण्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर

मेशी : मेशीसह परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान घटत असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व बिघडलेल्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे परिसरातील डाळींबबागा नामशेष झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याही शेवटच्या घटका मोजत आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून डाळींबबागांकडे पाहिले जायचे; मात्र घटते पर्जन्यमान, बिघडलेले हवामान व अफाट खर्च करूनही पदरी निराशाच येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींबबागा काढून टाकणे पसंत केले. कारण महागडी औषधे फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नाही अन् आलीच तर ऐनक्षणी निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो अन् डाळींबबागा उद्ध्वस्त करतो. या भागात कांदा पिकविणेही कठीण झाले आहे. अशावेळी डाळिंबासारखे नाजूक पीक घेणे अधिकच कठीण होते. एकेकाळी या परिसरात डाळींबबागांचे मोठे पेव आले होते. परंतु आता क्वचितच बागा दिसत आहेत. बाजारभावही स्थिर नसतो. सध्या बारमाही हवामान खराब असते. ऋतुमानात समतोल राहिलेला नाही. कधी धुके, बेमोसमी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान हे नेहमीचेच पाचविला पुजलेले आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार आहे. गहू, हरभरा, कांदा अगदीच नगण्य स्वरूपात पिकणार आहे. अन्नधान्यातील रब्बी हंगामातील गहू हे पीकसुद्धा दुर्मीळ झाले आहे. (वार्ताहर)