शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वारकरी परतीच्या मार्गावर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:56 IST

त्र्यंबकेश्वर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेवून दिंडीने आलेले राज्यभरातील वारकरी, भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.त्यामुळे शहर पुन्हा गजबजून गेले होते.

त्र्यंबकेश्वर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे दर्शन घेवून दिंडीने आलेले राज्यभरातील वारकरी, भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.त्यामुळे शहर पुन्हा गजबजून गेले होते.अनेक वारकऱ्यांनी बरोबर आणलेल्या ट्रॅक्टर किंवा ट्रकसह मिळेल त्या वाहनाची मदत घेतली. वारकरी दिंडीबरोबर छोटे मंदीर, पालखी, छोटा रथ जातांना आपल्या ट्रक-ट्रॅक्टरमध्ये सुरक्षित घेउन जातांना दिसत होते. परिवहन महामंडळाच्या जव्हार फाटा बस स्थानकात मोठी गर्दी झाली होती. त्यात खाजगी कार, रिक्षा, टेंपोच्या वर्दळीने बसेसची तारांबळ उडत होती. स्थानकप्रमुख एन एच जाधव ध्वनीक्षेपकावरून भाविकांना मार्गदर्शन करीत होते.दरम्यान काही मानाच्या दिंड्या आज देखील मुक्काम करतात.कारण संत निवृत्तीनाथ मंदीरात या मानाच्या दिंडी मानक-यांचा सत्कार नारळ प्रसाद देऊन केला जातो. त्यांच्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे स्नेहभोजन आयोजित केले जाते. ते भोजन केल्याशिवाय दिंडी मानकरी परत जात नाहीत. यावेळेस नारळ प्रसाद देण्याचा मान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांचा आहे. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक