शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गोदावरी नदीपात्रात पाणवेलीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:18 IST

गोदावरी नदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । नागरिकांत नाराजी

चांदोरी : येथील गोदावरीनदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे.चांदोरी - सायखेडा जुन्या पुलालगत पाणवेलीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झालेली असून, नदीपात्रात पसरण्यास सुरुवात झाली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्या काढाव्यात. जेणेकरून आणखी वाढून संपूर्ण पात्रात पसरणार नाही. मागील वर्षी या पाणवेली नांदूरमधमेश्वर ते माडसांगवी या तीस किलोमीटरपर्यंत ठिकठिकाणी पसरल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या पाणवेली चांदोरी - सायखेडा पुलाला अडकून दूरपर्यंत पसरत गेल्या होत्या. यामुळे आॅगस्ट २०१९मध्ये आलेल्या महापुराने पाण्याला अडथळा निर्माण होऊन नदीकाठी शेतात पाणी शिरले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाढत्या प्रदूषणामुळे पाणवेलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या पाणवेलींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे दूषितीकरण होत आहे तसेच मासे व जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. या पाणवेली सडल्याने दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने विविध रोगराई निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदोरी परिसरात गोदापात्रात असलेली हेमाडपंती मंदिरे व खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी पर्यटक येत असतात. ते दुर्गंधीमुळे नाराज आहेत. जलसंपदा व पाटबंधारे विभागाने या पाणवेली लवकर काढाव्यात, अशी मागणी होत आहे. जलसंपदा विभाग या पाणवेली काढण्यास दरवर्षी पैसे खर्च करते; परंतु ही पाणवेलीची समस्या त्यांनी कायमस्वरूपी कशी थांबवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गोदावरी नदीत पाणवेली वाढत असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.- बाळू आंबेकर, मासेमार

गोदावरी प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाणवेलींची वाढ सतत होत आहे. गोदामाईच्या प्रदूषणाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यावे व लवकरात लवकर गोदापात्र पाणवेली मुक्त करावे.- राजेंद्र टर्ले, ग्रामस्थ

टॅग्स :riverनदीgodavariगोदावरी