शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गोदावरी नदीपात्रात पाणवेलीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:18 IST

गोदावरी नदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । नागरिकांत नाराजी

चांदोरी : येथील गोदावरीनदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे.चांदोरी - सायखेडा जुन्या पुलालगत पाणवेलीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झालेली असून, नदीपात्रात पसरण्यास सुरुवात झाली आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्या काढाव्यात. जेणेकरून आणखी वाढून संपूर्ण पात्रात पसरणार नाही. मागील वर्षी या पाणवेली नांदूरमधमेश्वर ते माडसांगवी या तीस किलोमीटरपर्यंत ठिकठिकाणी पसरल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या पाणवेली चांदोरी - सायखेडा पुलाला अडकून दूरपर्यंत पसरत गेल्या होत्या. यामुळे आॅगस्ट २०१९मध्ये आलेल्या महापुराने पाण्याला अडथळा निर्माण होऊन नदीकाठी शेतात पाणी शिरले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाढत्या प्रदूषणामुळे पाणवेलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या पाणवेलींमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे दूषितीकरण होत आहे तसेच मासे व जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. या पाणवेली सडल्याने दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने विविध रोगराई निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदोरी परिसरात गोदापात्रात असलेली हेमाडपंती मंदिरे व खंडेराव महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी पर्यटक येत असतात. ते दुर्गंधीमुळे नाराज आहेत. जलसंपदा व पाटबंधारे विभागाने या पाणवेली लवकर काढाव्यात, अशी मागणी होत आहे. जलसंपदा विभाग या पाणवेली काढण्यास दरवर्षी पैसे खर्च करते; परंतु ही पाणवेलीची समस्या त्यांनी कायमस्वरूपी कशी थांबवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गोदावरी नदीत पाणवेली वाढत असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.- बाळू आंबेकर, मासेमार

गोदावरी प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाणवेलींची वाढ सतत होत आहे. गोदामाईच्या प्रदूषणाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यावे व लवकरात लवकर गोदापात्र पाणवेली मुक्त करावे.- राजेंद्र टर्ले, ग्रामस्थ

टॅग्स :riverनदीgodavariगोदावरी