शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:31 IST

सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देखुले आव्हान नगराध्यक्षांकडून पत्राव्दारे देण्यात आले आहे.

सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.माजी आमदार संजय चव्हाण यांनी राजीनामा मागीतल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष मोरे यांनी त्यांना आव्हान दिले असून, पाणी योजना पूर्णत्वास न गेल्यास आपण एकही निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करून तुम्हीही अशी हिम्मत दाखवाल का? असे थेट आव्हान चव्हाण यांना दिले आहे.शहरातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यास प्रत्युत्तरादाखल नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी चव्हाण यांना थेट पत्र लिहिले असून, ते प्रसिद्धीसही दिले आहे. माझा राजीनामा मागण्याची नैतिकता तुमच्याकडेही नाही. पाण्यासाठी शहर आणि तालुक्यातील जनतेने आपल्याला एकदा नाही, तर दोनदा आमदारकी दिली आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी पत्रात म्हटले असून त्यांनी पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जनतेने मुदतपूर्व राजीनामा मागितला तरी तो तत्काळ देण्याची माझी तयारी आहे; पण आपण मात्र एवढी वर्र्षं सत्ता उपभोगूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकला नाहीत म्हणून राजीनामा देणार का? असे खुले आव्हान नगराध्यक्षांकडून पत्राव्दारे देण्यात आले आहे.