शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून आज होणार पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:25 IST

गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग केला जाणार आहे.

ठळक मुद्देदक्षतेच्या सूचना : धरण क्षेत्रातील पावसामुळे पातळी वाढली

नाशिक : गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात सर्वदूर पाऊस असताना नाशिक जिल्ह्यावर मात्र पाऊस रुसला असल्याने पाण्याची चिंता निर्माण झाली होती. धरणातील पाणी आटल्यामुळे नाशिक शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले. सध्या दर गुरुवारी ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला आहे. धरणाने गाठलेला तळ तसेच पावसाअभावी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट गडद होत असतानाच पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पातळीत वाढ होत आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा ६३ टक्क्यांवर पोहोचला होता तर गुरुवारी सायंकाळपर्यंत जलसाठा ७५ टक्के झाला आहे. धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजता धरणातून ५०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरणात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

--इन्फो--

गुरुवारी सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रातील पाणी वाढणार असल्याने काठावरील नागरिकांनी आपले घर आणि दुकानांमधील साहित्याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण