शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरचे पाणी पेटले

By admin | Updated: February 23, 2016 22:29 IST

उपअभियंत्याचे वाहन अडविले : काही काळ तणावाची परिस्थिती

 कळवण : भेंडी गावातील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चणकापूरच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर प्रथम भेंडी पाझर तलाव भरावा या मागणीला यश आल्यानंतर अचानक कालव्याचे किमी २६वरील आपत्कालीन गेट वेल्डिंग करून ते बंद केल्याने भेंडी पाझर तलावात जाणारे पाणी बंद झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात आली.याप्रकरणी कळवण पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकाना अटक करून आणल्याने संपूर्ण भेंडी गावातील युवक, महिला व शेतकरी बांधवांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेत स्वत:ला अटक करून घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भेंडी आणि जुनी भेंडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भेंडी पाझर तलाव भरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने पाण्यासाठी या गावातील जनतेच्या तळमळीला महसूल, पाटबंधारे आणि पोलीस यंत्रणेने नेहमी सहकार्य केले असल्याने या गावातील टंचाईच्या झळा प्रशासकीय यंत्रणेला-देखील ज्ञात आहे, चणकापूर उजव्या कालव्याद्वारे मिळालेले पाणी पिण्यासाठी ३१ जुलैपर्यंत वापरण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसमोर असल्याने पाझर तलाव न भरता पाणी बंद झाल्याने वादाला ठिणगी पडली. उजव्या कालव्याचे आपत्कालीन गेटजवळ राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, उपसरपंच विलास रौंदळ यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत उपअभियंता पाटील यांना जाब विचारत घेराव घालून वाहन अडवून गांधीगिरीने त्यांचा सत्कार केला. शिवाय गेटवर बसून टाळ-मृदृंग वाजवत ‘पाटबंधारे विभागाचे पाटील यांना सुबुध्दी दे’ अशी प्रार्थना केली; मात्र ग्रामस्थांची भूमिका समजावून न घेता पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार केली. घटनास्थळी तहसीलदार अनिल पुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी धाव घेत आंदोलकांना अटक केल्याने प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने गावातील यात्रा महोत्सवाच्या आनंदावर विरजण टाकून ग्रामस्थांनी व महिलांनी पोलिस स्टेशन गाठून स्वत:ला अटक करून घेतली.पोलीस स्टेशनसह आवारात ग्रामस्थांनी एकच गर्दी केल्याने पाणीप्रश्न पेटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी धाव घेत पाठिंबा दिला. याप्रश्नी मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, शेतकरी नेते देवीदास पवार, शांताराम जाधव, राजेंद्र भामरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पाणीप्रश्नी घेतलेली आक्रमक भूमिका व भेंडी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे शासकीय यंत्रणा हतबल झाली. त्याचा प्रत्यय येत भेंडीकरांना पाण्याचा दिलासा मिळाला. (वार्ताहर)मविप्र संचालक रवींद्र देवरेंसह सर्वच पक्षांनी याप्रश्नी मध्यस्थी करत भेंडीचा पाणीप्रश्न सोडविला.चणकापूरच्या पाण्याने पेट घेतल्याची चिन्हे निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच पूर्व भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, भेंडीच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक आण िपाटबंधारे विभागाचे पाणी सोडण्याबाबत असलेल्या धोरणाबाबत जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांनी महत्वपूर्ण बजावत भेंडी ग्रामस्थ आण िपाटबंधारे विभागाच्या यंत्रणेमध्ये समन्वय घडविला, याप्रश्नी मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे ,,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास पवार ,कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार ,वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार ,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय रौंदळ तसेच आंदोलनकर्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ ,उपसरपंच विलास रौंदळ यांनी पाणी प्रश्नी जनिहताची भूमीका घेऊन नेतृत्वातील आक्र मकपणा टिकून ठेवल्याने पोलिस आण िपाटबंधारे विभागाच्या यंत्रणेवर दबाव वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेला आपली धार बोथट करावी लागली