शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:01 IST

शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.नगरपालिकेकडून अपुऱ्या जलसाठ्यामुळे आठ-दहा दिवसाला एकदा पाणी येते. दुष्काळी परिस्थिती नागरिकांना पाण्याची आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अल्प पर्जन्यमानामुळे पाणी पातळी खालावली असून अनेकांचे बोअरही आटले आहेत. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेसमोरील रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने येथून पाणी वाहात आठवडी बाजारात साचत आहे. त्यामुळे बाजारात ये-जा करणाºया नागरिकांना आणि व्यापाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे दुष्काळामुळे बाजारात पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. त्यातच पाण्याअभावी पशुपालक पशुधन बाजारात कवडीमोल दराने विक्री करत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoliहिंगोली