शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर  तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:03 IST

तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत. अत्यंत खेदाची बाब अशी दिसून येत आहे की, पाणीटंचाईसारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर शासन यंत्रणाच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी टँकर लावल्यामुळे टँकरचालकांवर कोणाचेच लक्ष नाही. वास्तविक अंबोली धरणातील पाण्याची पातळी झिरो आहे. सध्या डेडस्टॉकमधून त्र्यंबक शहरासाठी पाणी देण्यात येत आहे, पण टँकरचालक जवळचा जलाशय म्हणून अंबोलीचीच निवड करून अंबोली धरणातून टँकर भरतात. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊन त्र्यंबक शहराचा जलसाठा कमी होऊ शकतो.  मुळेगाव व तेथील पुंगटवाडी मिलनवाडी वगैरे वाड्यांना मुळेगावचे सरपंच नामदेव काशीराम सराई हे एप्रिलपासून स्वखर्चाने टँकर पुरवित आहेत. सरपंच सराई यांचे काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे. मागील वर्षापर्यंत मुळेगाव व तेथील वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जैन फाउण्डेशन पाणीपुरवठा करीत असे. यावर्षी सरपंचच पाणीपुरवठा करीत असल्याने जैन समूहाच्या वतीने मेटघर या सर्वात उंच ठिकाणी पाच हजार लिटर्सने मेटघर किल्ला व त्याच्या दोन्ही बाजूला दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याने मेटघरची दोन्ही बाजूची गैरसोय मिटली आहे. मेटघर ही तालुक्यातील सर्वात मोठी टंचाईची समस्या होती. जैन समूहाच्या पटणी यांनी ही बाब हेरून मेटघरच्या दोन्ही बाजूच्या पाड्यांना पाण्याची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे. मेटघरच्या पाणीपुरवठ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी आवाज उठविल्याने जेसीबीने रस्ता दुरुस्त करून पाच हजार लिटर्सचा टँकर आता व्यवस्थित पुरतो. तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई सोमनाथनगर, देवळा (आडगाव), मुरंबी, बेरवळ व मुळवड या गावांना व त्याचे पाडे, वाड्या या ठिकाणी आहे.देवळा- करंजविहीर, टोकपाडा, काकडवळण, रानघर, भासवड, नांदुरकीपाडा, बुरुडपाडा, उंबरणापाडा व राउतमाळतर.बेरवळ- पांगारपाणा, कुत्तरमाळ, उंबरदरी, कौलपोंडा आदी.  मूळवड- घोटबारी वळण, सावरपाडा, करंजपाणा आदी पाच गावे वाड्या पाडे या ठिकाणी पाच टँकर मंजूर होऊन फक्त चार टँकर सध्या सुरू आहेत. येत्या एकदोन दिवसात पाचवा टँकर सुरू होऊन एकूण टँकरची संख्या आता तालुक्यात पाच होईल. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी टँकर सोमनाथनगर, गणेशगाव वा. देवळा, मुरंबी, गावठा, बेरवळ व त्यांच्या वाडे पाडे येथे दोन असे चार व आज किंवा उद्या एक टँकर सुरू होऊन टँकरची संख्या पाच होईल.मनमानी : परस्पर टॅँकर बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोपत्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या तीन टँकरपैकी दोन टँकर मुरंबी आणि बेरवळ या दोन्ही गावांच्या वाड्या, पाडे यांना पाणीपुरवठा करणारे टँकर उंच भागात चढत नसल्याने टँकरचालकानेच परस्पर बंद केले आहेत. आता म्हणे पाच हजार लिटर्सचे टँकर आणणार आहेत; मात्र अद्याप बंद करण्यात आलेले टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. आता तालुक्यात केवळ सोमनाथनगर, गणेशगाव, विनायकनगर, शिवाजीनगर, दिव्याचा पाडा आदी गावे, पाडे येथे तीन खेपा होत आहेत. दर माणशी २० लिटर पाणी देण्यात येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई