शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

त्र्यंबकेश्वर  तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:03 IST

तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत. अत्यंत खेदाची बाब अशी दिसून येत आहे की, पाणीटंचाईसारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर शासन यंत्रणाच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी टँकर लावल्यामुळे टँकरचालकांवर कोणाचेच लक्ष नाही. वास्तविक अंबोली धरणातील पाण्याची पातळी झिरो आहे. सध्या डेडस्टॉकमधून त्र्यंबक शहरासाठी पाणी देण्यात येत आहे, पण टँकरचालक जवळचा जलाशय म्हणून अंबोलीचीच निवड करून अंबोली धरणातून टँकर भरतात. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊन त्र्यंबक शहराचा जलसाठा कमी होऊ शकतो.  मुळेगाव व तेथील पुंगटवाडी मिलनवाडी वगैरे वाड्यांना मुळेगावचे सरपंच नामदेव काशीराम सराई हे एप्रिलपासून स्वखर्चाने टँकर पुरवित आहेत. सरपंच सराई यांचे काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे. मागील वर्षापर्यंत मुळेगाव व तेथील वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जैन फाउण्डेशन पाणीपुरवठा करीत असे. यावर्षी सरपंचच पाणीपुरवठा करीत असल्याने जैन समूहाच्या वतीने मेटघर या सर्वात उंच ठिकाणी पाच हजार लिटर्सने मेटघर किल्ला व त्याच्या दोन्ही बाजूला दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याने मेटघरची दोन्ही बाजूची गैरसोय मिटली आहे. मेटघर ही तालुक्यातील सर्वात मोठी टंचाईची समस्या होती. जैन समूहाच्या पटणी यांनी ही बाब हेरून मेटघरच्या दोन्ही बाजूच्या पाड्यांना पाण्याची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे. मेटघरच्या पाणीपुरवठ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी आवाज उठविल्याने जेसीबीने रस्ता दुरुस्त करून पाच हजार लिटर्सचा टँकर आता व्यवस्थित पुरतो. तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई सोमनाथनगर, देवळा (आडगाव), मुरंबी, बेरवळ व मुळवड या गावांना व त्याचे पाडे, वाड्या या ठिकाणी आहे.देवळा- करंजविहीर, टोकपाडा, काकडवळण, रानघर, भासवड, नांदुरकीपाडा, बुरुडपाडा, उंबरणापाडा व राउतमाळतर.बेरवळ- पांगारपाणा, कुत्तरमाळ, उंबरदरी, कौलपोंडा आदी.  मूळवड- घोटबारी वळण, सावरपाडा, करंजपाणा आदी पाच गावे वाड्या पाडे या ठिकाणी पाच टँकर मंजूर होऊन फक्त चार टँकर सध्या सुरू आहेत. येत्या एकदोन दिवसात पाचवा टँकर सुरू होऊन एकूण टँकरची संख्या आता तालुक्यात पाच होईल. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी टँकर सोमनाथनगर, गणेशगाव वा. देवळा, मुरंबी, गावठा, बेरवळ व त्यांच्या वाडे पाडे येथे दोन असे चार व आज किंवा उद्या एक टँकर सुरू होऊन टँकरची संख्या पाच होईल.मनमानी : परस्पर टॅँकर बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोपत्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या तीन टँकरपैकी दोन टँकर मुरंबी आणि बेरवळ या दोन्ही गावांच्या वाड्या, पाडे यांना पाणीपुरवठा करणारे टँकर उंच भागात चढत नसल्याने टँकरचालकानेच परस्पर बंद केले आहेत. आता म्हणे पाच हजार लिटर्सचे टँकर आणणार आहेत; मात्र अद्याप बंद करण्यात आलेले टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. आता तालुक्यात केवळ सोमनाथनगर, गणेशगाव, विनायकनगर, शिवाजीनगर, दिव्याचा पाडा आदी गावे, पाडे येथे तीन खेपा होत आहेत. दर माणशी २० लिटर पाणी देण्यात येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई