शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

त्र्यंबकेश्वर  तालुक्यात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:03 IST

तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावे, वाड्यांना भीषण टंचाई आहे. अशा अवस्थेत शासनाकडून मागील तीन दिवसांपर्यंत कोणतीच उपाययोजना केली गेली नव्हती. तथापि टंचाई काळाच्या उत्तरार्धात तालुक्यात केवळ पाच टँकर मंजूर झाले आहेत; मात्र त्यातीलही केवळ तीन टँकर प्रत्यक्षात सुरू आहेत, तर दोन टँकर अद्यापही सुरू झालेले नाहीत. अत्यंत खेदाची बाब अशी दिसून येत आहे की, पाणीटंचाईसारख्या ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर शासन यंत्रणाच उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. खासगी टँकर लावल्यामुळे टँकरचालकांवर कोणाचेच लक्ष नाही. वास्तविक अंबोली धरणातील पाण्याची पातळी झिरो आहे. सध्या डेडस्टॉकमधून त्र्यंबक शहरासाठी पाणी देण्यात येत आहे, पण टँकरचालक जवळचा जलाशय म्हणून अंबोलीचीच निवड करून अंबोली धरणातून टँकर भरतात. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊन त्र्यंबक शहराचा जलसाठा कमी होऊ शकतो.  मुळेगाव व तेथील पुंगटवाडी मिलनवाडी वगैरे वाड्यांना मुळेगावचे सरपंच नामदेव काशीराम सराई हे एप्रिलपासून स्वखर्चाने टँकर पुरवित आहेत. सरपंच सराई यांचे काम खरोखरच कौतुकास्पद म्हणावे. मागील वर्षापर्यंत मुळेगाव व तेथील वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जैन फाउण्डेशन पाणीपुरवठा करीत असे. यावर्षी सरपंचच पाणीपुरवठा करीत असल्याने जैन समूहाच्या वतीने मेटघर या सर्वात उंच ठिकाणी पाच हजार लिटर्सने मेटघर किल्ला व त्याच्या दोन्ही बाजूला दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्याने मेटघरची दोन्ही बाजूची गैरसोय मिटली आहे. मेटघर ही तालुक्यातील सर्वात मोठी टंचाईची समस्या होती. जैन समूहाच्या पटणी यांनी ही बाब हेरून मेटघरच्या दोन्ही बाजूच्या पाड्यांना पाण्याची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे. मेटघरच्या पाणीपुरवठ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांनी आवाज उठविल्याने जेसीबीने रस्ता दुरुस्त करून पाच हजार लिटर्सचा टँकर आता व्यवस्थित पुरतो. तालुक्यात सर्वात भीषण पाणीटंचाई सोमनाथनगर, देवळा (आडगाव), मुरंबी, बेरवळ व मुळवड या गावांना व त्याचे पाडे, वाड्या या ठिकाणी आहे.देवळा- करंजविहीर, टोकपाडा, काकडवळण, रानघर, भासवड, नांदुरकीपाडा, बुरुडपाडा, उंबरणापाडा व राउतमाळतर.बेरवळ- पांगारपाणा, कुत्तरमाळ, उंबरदरी, कौलपोंडा आदी.  मूळवड- घोटबारी वळण, सावरपाडा, करंजपाणा आदी पाच गावे वाड्या पाडे या ठिकाणी पाच टँकर मंजूर होऊन फक्त चार टँकर सध्या सुरू आहेत. येत्या एकदोन दिवसात पाचवा टँकर सुरू होऊन एकूण टँकरची संख्या आता तालुक्यात पाच होईल. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी टँकर सोमनाथनगर, गणेशगाव वा. देवळा, मुरंबी, गावठा, बेरवळ व त्यांच्या वाडे पाडे येथे दोन असे चार व आज किंवा उद्या एक टँकर सुरू होऊन टँकरची संख्या पाच होईल.मनमानी : परस्पर टॅँकर बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोपत्र्यंबकेश्वर तालुक्यात यापूर्वी सुरू झालेल्या तीन टँकरपैकी दोन टँकर मुरंबी आणि बेरवळ या दोन्ही गावांच्या वाड्या, पाडे यांना पाणीपुरवठा करणारे टँकर उंच भागात चढत नसल्याने टँकरचालकानेच परस्पर बंद केले आहेत. आता म्हणे पाच हजार लिटर्सचे टँकर आणणार आहेत; मात्र अद्याप बंद करण्यात आलेले टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत. आता तालुक्यात केवळ सोमनाथनगर, गणेशगाव, विनायकनगर, शिवाजीनगर, दिव्याचा पाडा आदी गावे, पाडे येथे तीन खेपा होत आहेत. दर माणशी २० लिटर पाणी देण्यात येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई