शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

धोकादायक विहिरीऐवजी टाक्यांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:12 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीत केलेल्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणेच यंदाची दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, ज्या ठिकाणी धोकादायक विहिरीत उतरून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते, अशा ठिकाणी प्रशासनाकडून टाक्यांची व्यवस्था करण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसूरज मांढरे : टंचाईला तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन

नाशिक : लोकसभा निवडणुकीत केलेल्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणेच यंदाची दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, ज्या ठिकाणी धोकादायक विहिरीत उतरून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते, अशा ठिकाणी प्रशासनाकडून टाक्यांची व्यवस्था करण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.जिल्ह्यातील टंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी संबंधित सर्व यंत्रणांची बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, पशुधन अधिकारी, पाणीपुरवठा आदी यंत्रणांचा सहभाग आहे. जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची सध्याची पाण्याची परिस्थिती, पाण्याचा उद्भव, पाणी साठवणुकीची साधने या सर्व बाबींची माहिती घेऊन संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.जिल्ह्यातील बर्फ्याची वाडी व म्हैसमाळ या दोन ठिकाणी धोकादायक विहिरींमध्ये महिलांना उतरून पाणी भरावे लागत असल्याने असले प्रकार टाळण्यासाठी अशा ठिकाणी टाक्या पुरविण्यात येणार असून, त्या कशा उपलब्ध करता येतील त्याबाबत नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले.पाणीटंचाई व जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नी आपण स्वत: तालुक्याला भेटी देऊन माहिती घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा काळ वगळता सर्व यंत्रणांना टंचाईच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अशा अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या मतमोजणीचे कामही न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. निवडणूक काळात २०० टॅँकरला मंजुरीपालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दौºयात प्रशासनातील अधिकारी गैरहजर असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून, अधिकाºयांचे आकडे वेगळे सांगतात व प्रत्यक्ष परिस्थिती वाईट असल्याची प्रतितक्रया प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती त्याचा जिल्हाधिकाºयांनी इन्कार केला. मूळ निवडणूक आचारसंहितेतच अधिकाºयांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपस्थित राहू नये, असे नमूद करण्यात आलेले आहे. शिवाय आचारसंहिता अंशत: शिथिल केल्याचा निरोपही उशिरा मिळाल्याने अधिकारी या दौºयात उपस्थित राहू शकले नाही. लोकसभा निवडणुकीचे काम सुरू असतानाही सुमारे २०० टॅँकरला मंजुरी देण्यात आली असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.