शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उंबरदरी धरणातून पाणीचोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:41 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत पाटबंधारे विभागाच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस रात्रीच्या वेळी धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाकडून कारवाई : पंधरा दिवसांत दोनवेळा धाडी

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत पाटबंधारे विभागाच्या वतीने पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस रात्रीच्या वेळी धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जप्त करण्यात आले आहे.उंबरदरी धरणातून पाणीचोरी होत असल्याने नाशिक येथील पाटबंधारे विभागाच्या वतीने बुधवारी मध्यरात्री धाड टाकून सुरू असणारे विद्युतपंप जमा करण्यात आले आहे. उंबरदरी धरणावर प्रादेशिक जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा ही योजना अवलंबून आहे. धरणाची क्षमताही ५२ दशलक्ष घनफूट एवढी आहे. धरण साठ्यातही वाढ झाली असून, चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असूनही धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविलेली आहे अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी उपसा केला. त्यानंतर त्यांना पाटबंधारे विभागाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली. पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीधरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, पाणीचोरी होत राहिली तर ठाणगावसह सहभागी या पाचही गावांना पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी( आशापूर ), हिवरे , पिंपळे आदी वाड्या-वस्त्यांचा या योजनेत समावेश आहे. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बारामाही सध्या तरी सुटलेला आहे. धरणातील पाणीही खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, पाटबंधारे विभागाच्या वतीने जर या पाणीचोरी करणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.