शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:05 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे६७ टॅँकर्स सुरू : येवला तालुक्यात सर्वाधिक गावांचा समावेश

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्णातील अनेक गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये टॅँकर्स सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना शासकीय आणि खासगी टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुवठा केला जात आहे. येवला तालुक्यातील ४० गावे आणि २४ वाड्या अशा एकूण ६४ गावांना २३ टॅँकर्सद्वारे पाणीुपरवठा करण्यात येत आहे. येवल्याबरोबरच बागलाणमध्ये १९ गावे आणि एका वाडीवस्तीवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मालेगावमध्येदेखील पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सात गावांना आणि २२ वाड्यांना २९ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नांदगावमध्येदेखील ५ गावे आणि ४८ वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यांमध्येदेखील अनेक ठिकाणी टॅँकर्स सुरू आहेत.सिन्नरमध्ये १० गावे आणि १८ वाड्यांमध्ये टॅँकर्सने पाणीपुरवठा होत असल्याने तेथी रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्णातील दुष्काळी तालुक्यांमधून अलीकडे टॅँकर्सची मागणी वाढली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे टॅँकर्सची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून टॅँकर्स उपलब्ध करून करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी वेळीच टॅँकर्स उपलब्ध झाले आहेत.जिल्ह्णात २६ शासकीय आणि ४१ खासगी टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून टॅँकर्सची मागणीही वाढतच आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सद्य:स्थितीत ३३ विहिरींमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर नऊ विहिरी टॅँकर्स भरण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. टॅँकरच्या मंजूर फेºया आणि प्रत्यक्षातील फेºयांवर नियंत्रण ठेवून गाव, वाड्यांना होणाºया पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.