शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:05 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे६७ टॅँकर्स सुरू : येवला तालुक्यात सर्वाधिक गावांचा समावेश

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्णातील अनेक गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये टॅँकर्स सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना शासकीय आणि खासगी टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुवठा केला जात आहे. येवला तालुक्यातील ४० गावे आणि २४ वाड्या अशा एकूण ६४ गावांना २३ टॅँकर्सद्वारे पाणीुपरवठा करण्यात येत आहे. येवल्याबरोबरच बागलाणमध्ये १९ गावे आणि एका वाडीवस्तीवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मालेगावमध्येदेखील पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सात गावांना आणि २२ वाड्यांना २९ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नांदगावमध्येदेखील ५ गावे आणि ४८ वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यांमध्येदेखील अनेक ठिकाणी टॅँकर्स सुरू आहेत.सिन्नरमध्ये १० गावे आणि १८ वाड्यांमध्ये टॅँकर्सने पाणीपुरवठा होत असल्याने तेथी रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्णातील दुष्काळी तालुक्यांमधून अलीकडे टॅँकर्सची मागणी वाढली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे टॅँकर्सची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून टॅँकर्स उपलब्ध करून करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी वेळीच टॅँकर्स उपलब्ध झाले आहेत.जिल्ह्णात २६ शासकीय आणि ४१ खासगी टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून टॅँकर्सची मागणीही वाढतच आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सद्य:स्थितीत ३३ विहिरींमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर नऊ विहिरी टॅँकर्स भरण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. टॅँकरच्या मंजूर फेºया आणि प्रत्यक्षातील फेºयांवर नियंत्रण ठेवून गाव, वाड्यांना होणाºया पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.