शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:05 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे६७ टॅँकर्स सुरू : येवला तालुक्यात सर्वाधिक गावांचा समावेश

नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्णातील अनेक गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये टॅँकर्स सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना शासकीय आणि खासगी टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुवठा केला जात आहे. येवला तालुक्यातील ४० गावे आणि २४ वाड्या अशा एकूण ६४ गावांना २३ टॅँकर्सद्वारे पाणीुपरवठा करण्यात येत आहे. येवल्याबरोबरच बागलाणमध्ये १९ गावे आणि एका वाडीवस्तीवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मालेगावमध्येदेखील पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सात गावांना आणि २२ वाड्यांना २९ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नांदगावमध्येदेखील ५ गावे आणि ४८ वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यांमध्येदेखील अनेक ठिकाणी टॅँकर्स सुरू आहेत.सिन्नरमध्ये १० गावे आणि १८ वाड्यांमध्ये टॅँकर्सने पाणीपुरवठा होत असल्याने तेथी रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्णातील दुष्काळी तालुक्यांमधून अलीकडे टॅँकर्सची मागणी वाढली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे टॅँकर्सची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून टॅँकर्स उपलब्ध करून करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी वेळीच टॅँकर्स उपलब्ध झाले आहेत.जिल्ह्णात २६ शासकीय आणि ४१ खासगी टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून टॅँकर्सची मागणीही वाढतच आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सद्य:स्थितीत ३३ विहिरींमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर नऊ विहिरी टॅँकर्स भरण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. टॅँकरच्या मंजूर फेºया आणि प्रत्यक्षातील फेºयांवर नियंत्रण ठेवून गाव, वाड्यांना होणाºया पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.