शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

पाणी फाऊंडेशनची जलचळवळ अखंड सुरू रहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 6:59 PM

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे.

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे. पानी फाऊंडेशनने सुरु केलेली ही जलचळवळ अखंड सुरु रहावी तसेच पाण्याचे मोल ओळखून तालुक्यातील सर्वच गावांनी पुढील वर्षी होणाऱ्या वॉटर कप २०१९ च्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात पानी फाउंडेशनच्या वतीने २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन जलसंधारणाचे काम उभे करणाºया तालुक्यातील सात गावांसह जलमित्रांचा गौरव यावेळी करण्यात आला. व्यासपीठावर शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, तहसीलदार नितीन गवळी, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नासाकाचे माजी संचालक अशोक डावरे आदी उपस्थित होते. आमदार वाजे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमाने युवा मित्र संस्थेसह आपण यापुर्वीच जलचळवळीत सहभाग घेतला. मात्र पानी फाउंडेशनच्या कामाने काम करण्याची उर्जा मिळाली. कोनांबे गावाच्या उशाला धरण असताना देखील या गावच्या ग्रामस्थांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळे त्यांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन मोठी जलचळवळ उभारली. त्यामानाने पूर्व भागातील गावांना पाण्याची गरज असताना त्यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने आमदार वाजे यांनी खंत व्यक्त केली.पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्याने यंदा अंदाजे १५ लाख क्युबिक मीटरचे जलसंधारणाचे काम केले असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी पगार यांनी दिली. पहिले वर्ष असल्याने प्रशासन थोडे कमी पडले असेल, मात्र पुढच्या वर्षीची तयारी आम्ही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेपासूनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदय सांगळे यांनी स्पर्धेच्या माध्यमाने जलसंधारणाची कामे करून पाणी साठविण्यासाठी भांडे तयार केले आहे. आता पुरेशा पावसाची प्रतीक्षा असल्याचे नमूद केले. सात गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.यावेळी सर्व सहभागी गावे व घटकांना जलरत्न म्हणून गौरविण्यात आले. या उपक्र मात सहभागी घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आल्याचे अशोक बरुंगले यांनी सांगितले. यावेळी रामपूर, पाटपिंप्री, कोनांबे, हरसुले, वडझिरे, धोंडबार, औंढेवाडी आदी गावचे ग्रामस्थ, तसेच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, एस. एस. के. पब्लिक स्कूल, मविप्रचे विद्यार्थी, बीजेएसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले, नवनाथ बढे, सुनीता पाटणे, विजय कोळी आदींनी परिश्रम घेतले.फोटो क्र.- 10२्रल्लस्रँ01फोटो ओळी- सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील जलमित्रांना जलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, उपसभापती जगन्नाथ भाबड. समवेत उदय सांगळे, नितीन गवळी, रत्नाकर पगार, अशोक डावरे, अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले आदि.

टॅग्स :Waterपाणी