शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

पाणी फाऊंडेशनची जलचळवळ अखंड सुरू रहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:59 IST

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे.

सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे. पानी फाऊंडेशनने सुरु केलेली ही जलचळवळ अखंड सुरु रहावी तसेच पाण्याचे मोल ओळखून तालुक्यातील सर्वच गावांनी पुढील वर्षी होणाऱ्या वॉटर कप २०१९ च्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात पानी फाउंडेशनच्या वतीने २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन जलसंधारणाचे काम उभे करणाºया तालुक्यातील सात गावांसह जलमित्रांचा गौरव यावेळी करण्यात आला. व्यासपीठावर शिवसेना युवा नेते उदय सांगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, तहसीलदार नितीन गवळी, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नासाकाचे माजी संचालक अशोक डावरे आदी उपस्थित होते. आमदार वाजे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमाने युवा मित्र संस्थेसह आपण यापुर्वीच जलचळवळीत सहभाग घेतला. मात्र पानी फाउंडेशनच्या कामाने काम करण्याची उर्जा मिळाली. कोनांबे गावाच्या उशाला धरण असताना देखील या गावच्या ग्रामस्थांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळे त्यांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन मोठी जलचळवळ उभारली. त्यामानाने पूर्व भागातील गावांना पाण्याची गरज असताना त्यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने आमदार वाजे यांनी खंत व्यक्त केली.पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्याने यंदा अंदाजे १५ लाख क्युबिक मीटरचे जलसंधारणाचे काम केले असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी पगार यांनी दिली. पहिले वर्ष असल्याने प्रशासन थोडे कमी पडले असेल, मात्र पुढच्या वर्षीची तयारी आम्ही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेपासूनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदय सांगळे यांनी स्पर्धेच्या माध्यमाने जलसंधारणाची कामे करून पाणी साठविण्यासाठी भांडे तयार केले आहे. आता पुरेशा पावसाची प्रतीक्षा असल्याचे नमूद केले. सात गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.यावेळी सर्व सहभागी गावे व घटकांना जलरत्न म्हणून गौरविण्यात आले. या उपक्र मात सहभागी घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आल्याचे अशोक बरुंगले यांनी सांगितले. यावेळी रामपूर, पाटपिंप्री, कोनांबे, हरसुले, वडझिरे, धोंडबार, औंढेवाडी आदी गावचे ग्रामस्थ, तसेच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, एस. एस. के. पब्लिक स्कूल, मविप्रचे विद्यार्थी, बीजेएसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले, नवनाथ बढे, सुनीता पाटणे, विजय कोळी आदींनी परिश्रम घेतले.फोटो क्र.- 10२्रल्लस्रँ01फोटो ओळी- सिन्नर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील जलमित्रांना जलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, उपसभापती जगन्नाथ भाबड. समवेत उदय सांगळे, नितीन गवळी, रत्नाकर पगार, अशोक डावरे, अशोक भांडकोळी, अशोक बुरुंगले आदि.

टॅग्स :Waterपाणी