शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 22:43 IST

कणकोरी योजना : थकीत वीज देयक भरले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाची रक्कम अदा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. चार दिवसांपासून ठप्प असलेल्या योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला. भोजापूर धरणावरील विहिरीतील विद्युतपंपाचे सुमारे साडेतीन लाख रुपये वीज देयक थकल्याने कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून नांदूरशिंगोटे व उर्वरित गावांचा नळपाणीपुरवठा ठप्प झाला होता. भोजापूर धरणात पाणी असूनही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. कणकोरीसह पाच पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे व पाणीपुरवठा समितीची स्थापना करणे यासाठी सोमवारी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल सांगळे, सरपंच पांडुरंग आगिवले, अलका म्हस्के, नीलेश जगताप, सुनीता अहिरे, संगीता बर्डे, गोपाळ शेळके, संजय शेळके, रवींद्र शेळके, दीपक बर्के, श्रीकांत वाक्चौरे, अशोक गवारे, हिराबाई आव्हाड, भाऊसाहेब बोडके, काशीनाथ कुऱ्हे, मनीषा शेळके, बाळासाहेब म्हस्के, सचिव जे. जी. वाडगे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता टी. पी. राजवाडे आदि उपस्थित होते. पाच गावांतील प्रत्येकी तीन अशा १५ सदस्यांचा समावेश असलेली नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सदर योजनेच्या जलवाहिनीतून पाणी चोरीस होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी सचिव वाडगे यांनी समितीचे निकष व माहिती दिली. सुमारे सव्वा लाख रुपयांच्या आसपास दरमहा खर्च असलेल्या या योजनेत सहभागी पाच गावांची पाणीपट्टी प्रत्येक महिन्याला सुमारे ९० हजार रुपये इतकीच जमा होते. त्यामुळे दर महिन्याला २० हजार रुपये थकबाकी वाढत असल्याचे वाडगे यांनी सांगितले. (वार्ताहर)