शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

नऊ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:53 IST

पेठ : मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पेठ : (रामदास शिंदे) मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.पेठ तालुका तसा नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या दृष्टीने जवळपास दुसऱ्याक्रमांकावर असतो. मात्र प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव यामुळे जानेवारीपासून बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. सुदैवाने मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मागील वर्षाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पेठ तालुक्यात सद्यस्थितीत तोंडवळ, शिदमाळ, हनुमंतपाडा (भू.), आमडोंगरा, डोंगरशेत, मोहपाडा, सादडपाडा (रान.), घुबडसाका, उखळीमाळ, रानविहीर या गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तिळभाट, वैतागपाडा, खोकरतळे, नवापाडा, अंबास, सादडपाडा (सु.), मोहालीपाडा, सातपुतेपाडा आदी गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागवली जात आहे.उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याकडे दुसºया टप्प्यातील जांभूळमाळ, घोटविहिरा, मानकापूर, चिरेपाडा, बोरीचीबारी, मांडणपाडा, निरगुडे, भिंतघर या गावांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, उपअभियंता वसंत गवळी आदी टंचाई निवारणासाठी प्रयत्नशील आहेत.-----------------------------शिराळे धरणात पुरेसा साठा पेठ शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई शिराळे धरणामुळे कायमची मिटली असून, सद्यस्थितीत पेठ शहराला पाणीपुरवठा करणाºया शिराळे धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पेठवासीयांची टंचाईपासून मुक्तता झाली आहे. शिवाय पाहुचीबारी, हरणगाव, गावंधपाडा, इनामबारी, पाटे, शिंदे आदी लहानमोठ्या धरणात पाणीसाठा असल्याने परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.२ सोशल नेटवर्किंग फोरम यासारख्या सामाजिक संस्थेने शेवखंडी, खोटरेपाडा, वाजवड, केळबारी, वडपाडा आदी गावांना मोफत पाणीपुरवठा योजना राबवत टंचाईच्या खाईतून बाहेर काढले आहे. आपली आपुलकी बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे व नंदा कुशारे यांनी अतिदुर्गम बोंडारमाळ या गावाची ७० वर्षांपासूनची पाण्याची तहान भागवली.

----------------------------------------

पेठ तालुक्यातील १०३ गावांसाठी संभाव्य टंचाई आराखडा पंचायत समिती लघु पाटबंधारे व महसूल विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्र माने टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे व खासगी विहीर अधिग्रहीत करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना केली असून, कोरोनाच्या संकटात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासन काम करीत आहे.- संदीप भोसले, तहसीलदार, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक