शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

नऊ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:53 IST

पेठ : मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पेठ : (रामदास शिंदे) मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.पेठ तालुका तसा नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या दृष्टीने जवळपास दुसऱ्याक्रमांकावर असतो. मात्र प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व सिंचन प्रकल्पांचा अभाव यामुळे जानेवारीपासून बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. सुदैवाने मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मागील वर्षाच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पेठ तालुक्यात सद्यस्थितीत तोंडवळ, शिदमाळ, हनुमंतपाडा (भू.), आमडोंगरा, डोंगरशेत, मोहपाडा, सादडपाडा (रान.), घुबडसाका, उखळीमाळ, रानविहीर या गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तिळभाट, वैतागपाडा, खोकरतळे, नवापाडा, अंबास, सादडपाडा (सु.), मोहालीपाडा, सातपुतेपाडा आदी गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागवली जात आहे.उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याकडे दुसºया टप्प्यातील जांभूळमाळ, घोटविहिरा, मानकापूर, चिरेपाडा, बोरीचीबारी, मांडणपाडा, निरगुडे, भिंतघर या गावांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, उपअभियंता वसंत गवळी आदी टंचाई निवारणासाठी प्रयत्नशील आहेत.-----------------------------शिराळे धरणात पुरेसा साठा पेठ शहराच्या पाचवीला पूजलेली पाणीटंचाई शिराळे धरणामुळे कायमची मिटली असून, सद्यस्थितीत पेठ शहराला पाणीपुरवठा करणाºया शिराळे धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पेठवासीयांची टंचाईपासून मुक्तता झाली आहे. शिवाय पाहुचीबारी, हरणगाव, गावंधपाडा, इनामबारी, पाटे, शिंदे आदी लहानमोठ्या धरणात पाणीसाठा असल्याने परिसरातील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.२ सोशल नेटवर्किंग फोरम यासारख्या सामाजिक संस्थेने शेवखंडी, खोटरेपाडा, वाजवड, केळबारी, वडपाडा आदी गावांना मोफत पाणीपुरवठा योजना राबवत टंचाईच्या खाईतून बाहेर काढले आहे. आपली आपुलकी बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उद्योजक दौलत कुशारे व नंदा कुशारे यांनी अतिदुर्गम बोंडारमाळ या गावाची ७० वर्षांपासूनची पाण्याची तहान भागवली.

----------------------------------------

पेठ तालुक्यातील १०३ गावांसाठी संभाव्य टंचाई आराखडा पंचायत समिती लघु पाटबंधारे व महसूल विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात आला असून, प्राधान्यक्र माने टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे व खासगी विहीर अधिग्रहीत करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना केली असून, कोरोनाच्या संकटात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासन काम करीत आहे.- संदीप भोसले, तहसीलदार, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक