शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

चांदवड तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांना १८ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:49 IST

चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. मे महिनाी संपत आला तरी पाणीटंचाईची समस्या कायम आहे.

तालुक्यातील भयाळे व गोहरण या दोन गावांचे तसेच १८ वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्या गावांनाही लवकरच टॅँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ४४ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवरून एवढ्या गावांची तहान भागत नसल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील विहीर अधिग्रहीत केली असून, तेथून पाणी भरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या विहिरीचेही पाणी किती दिवस पुरेल याबाबत प्रशासनाने शंका व्यक्त केली असून यंदाचा दुष्काळ तीव्र असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील व पाणीपुरवठा अधिकारी सी.जे. मोरे यांनी दिली. चांदवड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्याच्या मध्यावर तालुक्यातील जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ, उसवाड, नांदुरटेक, राहुड, नारायणगाव, कुंडाणे, खडकओझर, गुºहाळे या चौदा गावांसह हिरापूर येथील धनगरवाडी, तळेगाव रोही येथील दत्तवाडी, घुमरे वस्ती, बजरंगनगर व काजीसांगवी येथील दुर्गानगर, भाटगाव येथील माळी वस्ती, नांदुरटेक येथील चिचंबारी वस्ती, शिंगवे येथील झाल्टे, मढे , रामवाडी, खताळ, शिंदे, शेख, गुंड, रायपूर येथील बारभाई, मदरवाडी, रानमळा, गंगावे, दुगाव रोड, तुकाराम वाडी, कातरवाडी येथील रानमळा, भडाणे येथील पट्टीचा मळा, दत्तवाडी, मेसनखेडे खुर्द येथील ठोंबरे वस्ती, मार्कंड वस्ती, जेजुरे वस्ती, निंबाळे येथील कोल्हे, खर्डी, गाढे, पाटोळेवस्ती, शिंदे तर गंगावे येथील नरोटेवस्ती व राजदेरवाडी येथील भामदरी वस्ती, काळखोडे येथील शेळके वस्ती, डुकरे वस्ती, वाकी खुर्द येथील देवढेवस्ती, गोरडे वस्ती, पन्हाळे येथील सोनवणे वस्ती, देवरगाव येथील गोधडेवस्ती, पिंपळवस्ती, गायराण वस्ती, रेडगाव खुर्द येथील काळेवस्ती, साळसाणे येथील ठाकरे, शिंदे वस्ती, तळेगाव रोही येथील आंबेडकर वस्ती, मल्हारनगर, वाहेगावसाळ येथील मुस्लीम वस्ती, खैरे वस्ती, गांगुर्डे वस्ती, वाणी मळा तर कोलटेक येथील खांगळवस्ती, पाटे येथील शिंदे वस्ती, वाकी बुद्रूक येथील शेलार वस्ती, वडगावपंगू येथील कांडेकर वस्ती, गोजरे वस्ती, शिरुर येथील कारवाडी, नन्हावे येथील मोगलवस्ती, खडकओझर, गु-हाळे, विटावे येथील योगेश्वरवस्ती, सोनीसांगवी, ठाकरे वस्ती या ५२ वाड्यांना १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातून टॅँकरच्या दररोज फेºया होत आहेत. शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावांच्या मंजुरीअगोदर त्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच प्रस्ताव सादर करा, असे प्रशासनाचे निर्देश असल्यानेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई