शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:44 IST

मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांची तहान टॅँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. धरणांमधील पाणी चोरण्यांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे.तालुक्यात पाणी टंचाईने रौद्ररुप धारण केले आहे. पावसाळ्यात केवळ १७५ मीमी पाऊस झाला आहे. जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. दिवसागणिक वाढत्या उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसह ग्रामपंचायतीच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तालुक्यातील मेहुणे, दुंधे, टाकळी, सावकारवाडी, वºहाणे, झाडी, निंबायती, चौकटपाडे, निमगाव, चोंढी, नगाव दिगर आदि गावांना दररोज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विविध गावांच्या ४९ वाड्यांना टॅँकर सुरू करण्यात आले आहे. दररोज ३२ खेपांद्वारे ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तळवाडे व संगमेश्वर भागातील दोन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. एका बोअरवेलचा ताबा घेण्यात आला आहे. येथून टंचाईग्रस्त ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकर भरुन पाणीपुरविले जात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी एक शासकीय व दहा खाजगी टॅँकर लावण्यात आले आहेत. गरजेनुसार टॅँकरच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाई तालुक्याला जाणावणार असून टॅँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी