शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कालभैरवनाथ यात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: March 10, 2016 23:30 IST

बोकटे : ३२ वर्षांची पाणी सोडण्याची प्रथा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

अंदरसूल : बोकटे येथील कालभैरवनाथ हे अतिशय जागृत देवास्थानांपैकी एक मानले जाते. त्यामुळेच हे देवस्थान नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर परिचित आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात कालाष्टमीला बोकटे येथे मोठी यात्रा भरवली जाते. या यात्रेसाठी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, पुणे, मुंबई आदि जिल्ह्यांबरोबर महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून सुमारे पाच लाख भाविक हजेरी लावतात. तीन ते चार दिवस ही यात्रा सुरू असते. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या बोकटे येथील कालभैरवनाथ यात्रोत्सवावर यावर्षी मात्र पाणीटंचाईचे सावट असणार आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे पालखेड धरण समूहात पाणीसाठा खूप कमी आहे. जानेवारी २०१४ या वर्षाचा पाणीसाठा ६५ टक्के इतका होता. या तुलनेत १ जाने. २०१६ च्या आकडेवारीनुसार २०१५ सालापर्यंत फक्त ४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यात बाष्पीभवन आणि धरण क्षेत्रातील जमिनीत मुरणारे पाणी यामुळे हा साठादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा कमी आहे. या कारणामुळे यंदाच्या यात्रोत्सवासाठी पाणी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ३२ वर्षांपूर्वी पूर्व भागातील जि. प. सभापती रायभान काळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दरवर्षी बोकटे येथील कालभैरव यात्रोत्सवासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. यानुसार गेली ३२ वर्षे नियमित यात्रोत्सवाला पाणी मिळत होते, तसेच यात्रोत्सवासाठी येणाऱ्या पाण्यामुळे कोळगंगा नदीपात्रावरील अनुक्र मे धामणगाव,अंदरसूल गवंडगाव, बोकटे, देवळाणे, दुगलगाव आणि नगर जिल्ह्यातील तिळवणी या गावांचा पाणी प्रश्न काही दिवस सुटत होता, परंतु यावर्षी प्रशासनाने पालखेड धरण समूहावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी यात्रेला पाणी न सोडण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे बोकटे यात्रोत्सवाला पाणी येणार नाही हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. यामुळे यात्रा काळात लाखो भाविकांच्या पिण्याच्या व वापरण्याचा पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)