शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कालभैरवनाथ यात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: March 10, 2016 23:30 IST

बोकटे : ३२ वर्षांची पाणी सोडण्याची प्रथा यावर्षी खंडित होण्याची शक्यता

अंदरसूल : बोकटे येथील कालभैरवनाथ हे अतिशय जागृत देवास्थानांपैकी एक मानले जाते. त्यामुळेच हे देवस्थान नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर परिचित आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात कालाष्टमीला बोकटे येथे मोठी यात्रा भरवली जाते. या यात्रेसाठी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, पुणे, मुंबई आदि जिल्ह्यांबरोबर महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून सुमारे पाच लाख भाविक हजेरी लावतात. तीन ते चार दिवस ही यात्रा सुरू असते. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या बोकटे येथील कालभैरवनाथ यात्रोत्सवावर यावर्षी मात्र पाणीटंचाईचे सावट असणार आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे पालखेड धरण समूहात पाणीसाठा खूप कमी आहे. जानेवारी २०१४ या वर्षाचा पाणीसाठा ६५ टक्के इतका होता. या तुलनेत १ जाने. २०१६ च्या आकडेवारीनुसार २०१५ सालापर्यंत फक्त ४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यात बाष्पीभवन आणि धरण क्षेत्रातील जमिनीत मुरणारे पाणी यामुळे हा साठादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा कमी आहे. या कारणामुळे यंदाच्या यात्रोत्सवासाठी पाणी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ३२ वर्षांपूर्वी पूर्व भागातील जि. प. सभापती रायभान काळे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दरवर्षी बोकटे येथील कालभैरव यात्रोत्सवासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. यानुसार गेली ३२ वर्षे नियमित यात्रोत्सवाला पाणी मिळत होते, तसेच यात्रोत्सवासाठी येणाऱ्या पाण्यामुळे कोळगंगा नदीपात्रावरील अनुक्र मे धामणगाव,अंदरसूल गवंडगाव, बोकटे, देवळाणे, दुगलगाव आणि नगर जिल्ह्यातील तिळवणी या गावांचा पाणी प्रश्न काही दिवस सुटत होता, परंतु यावर्षी प्रशासनाने पालखेड धरण समूहावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी यात्रेला पाणी न सोडण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे बोकटे यात्रोत्सवाला पाणी येणार नाही हे आता जवळ जवळ निश्चित झाले आहे. यामुळे यात्रा काळात लाखो भाविकांच्या पिण्याच्या व वापरण्याचा पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)