शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:37 IST

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना ठप्प : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण मंडळाचा अनागोंदी कारभार

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.एप्रिल महिन्यात पूर्वभागातील अक्राळे, खतवड, पालखेड, आंबे दिंडोरी, खडक सुकेणा, कोराटे या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना राबवली होती. या गावांमध्ये जलकुंभसुद्धा बांधून तयार आहे; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे अजूनही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या अक्राळे येथे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलावर्गाला मध्यरात्री उठून कसरत करावी लागत आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे गावात असलेल्या जलकुंभात स्वखर्चाने पाणी टाकून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या मळ्यातून गावात पाणी घेऊन येतात; परंतु ज्यांच्याकडे काही सुविधा उपलब्ध नाही, त्यांना पाणी मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे.गावाजवळच सध्या औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी पालखेड धरणावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या योजनेतअक्राळे गावचादेखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जवळच असणाºया मोहाडी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशगावालासुद्धा ऐन एप्रिल महिन्यात तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. गावात असणाºया नळ पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जानोरी, मोहाडी, ओझर, साकोरे या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु गणेशगाव उंचावर असल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याद्वारे नळांना दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. या विहिरीत उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असल्यामुळे महिलांना पाणी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तशी कमी आहे. उन्हाळा आला की नियोजन आराखडा आखला जाता,े मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.दिंडोरी तालुक्यात चिकाडी, तळेगाव दिंडोरी, तळेगाव वणी, मानोरी, गवळवाडी, चिंचखेड आदींसह इतर गावे असून, आत्तापर्यंत पाणीटंचाईचा प्रस्ताव कोणत्याही गावाकडून आलेला नाही. पुढील काही दिवसात टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने वरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करत आहे.