शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:37 IST

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना ठप्प : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण मंडळाचा अनागोंदी कारभार

दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.एप्रिल महिन्यात पूर्वभागातील अक्राळे, खतवड, पालखेड, आंबे दिंडोरी, खडक सुकेणा, कोराटे या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना राबवली होती. या गावांमध्ये जलकुंभसुद्धा बांधून तयार आहे; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे अजूनही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या अक्राळे येथे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलावर्गाला मध्यरात्री उठून कसरत करावी लागत आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे गावात असलेल्या जलकुंभात स्वखर्चाने पाणी टाकून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या मळ्यातून गावात पाणी घेऊन येतात; परंतु ज्यांच्याकडे काही सुविधा उपलब्ध नाही, त्यांना पाणी मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे.गावाजवळच सध्या औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी पालखेड धरणावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या योजनेतअक्राळे गावचादेखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जवळच असणाºया मोहाडी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशगावालासुद्धा ऐन एप्रिल महिन्यात तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. गावात असणाºया नळ पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जानोरी, मोहाडी, ओझर, साकोरे या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु गणेशगाव उंचावर असल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याद्वारे नळांना दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. या विहिरीत उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असल्यामुळे महिलांना पाणी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तशी कमी आहे. उन्हाळा आला की नियोजन आराखडा आखला जाता,े मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.दिंडोरी तालुक्यात चिकाडी, तळेगाव दिंडोरी, तळेगाव वणी, मानोरी, गवळवाडी, चिंचखेड आदींसह इतर गावे असून, आत्तापर्यंत पाणीटंचाईचा प्रस्ताव कोणत्याही गावाकडून आलेला नाही. पुढील काही दिवसात टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने वरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करत आहे.