शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे पाणीटंचाई

By admin | Updated: May 7, 2016 22:16 IST

चांदवड तालुका : ५६ गावांना फटका; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष

महेश गुजराथी  चांदवडचांदवड तालुक्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षित झाल्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात ओझरखेड धरणावरून माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी शासनाच्या पाठीलागून ४४ गाव नळ योजना करून घेतली होती. या योजनेची व्याप्ती वाढवून चांदवड तालुक्यातील सुमारे ५८ गावांना या योजनेचे पाणी गेल्या १५ वर्षांपासून मिळत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ओझरखेड धरणातील जीवंत पाणीसाठा उचलण्याची परवानगी देताना योग्य बाबींचा विचार केला नाही. यामुळे आजमितीस मृत साठ्यातून पाणी घेण्याची वेळ आली असल्याचा निष्कर्ष जाणकारांनी काढला आहे. धरणातील जीवंत साठा आज असता तर या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते अशी स्थिती ओझरखेड धरणावर प्रत्यक्ष पाहणी केली असता समोर आली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच नव्हे तर संबंधित पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी यांनी जीवंत साठ्यातून पाणी उचलण्याची परवानगी दिली नसती, तर चांदवड तालुक्यातील या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले नसते, असा निष्कर्ष पाहणीनंतर पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. १५ ते १८ वर्षांपूर्वी चांदवड तालुक्यासाठी ओझरखेड धरणावरून पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४४ गाव नळ योजना सुरू केली होती. तत्कालीन सरकारने या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केला. त्यानंतर माजी आमदार जयचंद कासलीवाल सरकारच्या पाठीलागून योजना पूर्ण करून घेतली, तर माजी आमदार शिरीश कोतवाल यांनी या ४४ गाव योजनेसाठी धोडंबे येथे जल शुद्धीकरण केंद्र मंजूर करून कार्यान्वित केले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून चांदवड तालुक्यातील सुमारे ५६ ते ५८ गावांचा पाणीप्रश्न सुटला होता. ओझरखेड धरणाची साठवण क्षमता २१०० दलघफू असून, आता अवघा ३०० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. या योेजनेसाठी असलेल्या मोटारी जुन्या झाल्याने गाळ व क्षारामुळे त्या बंद पडल्या आहेत. आज दुसऱ्या योजनेच्या ४०० एचपीचे पंप आणून पाणी उपसा होत आहे. ओझरखेड धरणापासून धोडंबे जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ४५७ एमएम व्यासाची एमएस लाइन टाकून दोन किमीपर्यंत जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यापुढे २८ किमीमीटर ५६ ते ५८ गावांना प्लॅस्टिक पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सातत्याने ४० तास पंपिग झाले तर या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र येथील जॅकवेलला सुमारे ३८० ते ४४० व्होल्टेज लागते. बऱ्यावेळा व्होल्टेजच्या तक्रारींमुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. शासनाने खास मंजुरी देऊन येथे ७५ लाख रुपये खर्चून एक्स्प्रेस फिडर टाकला आहे. या योजनेचे काही पंप खराब झाल्याने व ही योजना जुनी झाल्याने पंप तातडीने बदलण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्रलंबित असल्याचे जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी दुसऱ्या योजनेचे पंप आणून सध्या पाणीपुरवठा होत आहे. दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी ओझरखेडे धरणात पाणी असताना धोडंबेपर्यंत पाणी जात होते; मात्र ६० किमीच्या लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण, चोरीचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पाइपलाइनकडे पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नाही. ओझरखेड धरणावर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धरणातील पाणीसाठा व इतर माहिती घेण्यासाठी गेलेले चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगरसेवक व शिवसेना गटनेते जगन्नाथ राऊत, पाणीपुरवठा सभापती अशपाक खान, संदीप उगले, नगरसेवक अ‍ॅड. नवनाथ अहेर, बाळासाहेब वाघ, सुनील डुंगरवाल, प्रा. एन. झेड. जैन, अंकुर कासलीवाल, गणेश पारवे, रवि बडोदे, बाळा पाडवी, राहुल हांडगे, संदीप कोतवाल आदिंना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता डी.एम. शहा, शाखा अभियंता डी. जे. भोसले यांनी ही माहिती दिली.