शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आसखेडा गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:18 IST

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .

नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .‘नदी उशासी परंतु कोरड घशासी’ या उक्तीनुसार आसखेडा गावाची आज अवस्था झाली आहे . एकेकाळी बागलाण तालुक्यात सर्वात जास्त बागायतदार गाव म्हणुन या गावची ख्याती होती . सलग तिन वर्ष गारपिट झाल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडल्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिति नाजुक झाली . लोकसंख्या चार हजाराच्या आस पास असून मतदार संख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे . गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता .सामान्य नागरिक हंडाभर पाण्यासाठी पायी वण वण फिरताना दिसत आहे . ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरी आहेत .मात्र भुगर्भात जलसाठा नसल्यामुळे त्या कोरड्या पडल्या आहेत . गावाचा विस्तार लक्षात घेता दरोरोज किमान एक लाख लीटर पाण्याची दैनंदिन गरज आहे .मात्र एवढे पाणी ग्रा पंचयात मधुन उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील जनतेचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष वाढत होता . अखेर गावच्या सरपंच जया सावला यांनी आपल्या स्वत:च्या विहिरीतुन दररोज ७० हजार लीटर पाणी उपलब्ध करु ण गावाची तहान भागवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. या कामी राजेन्द्र सावला , भाऊसाहेब सावला , दीपक कापडनिस यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे दिसत असून हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.--------------------------स्वर्गीय विजय सावला यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या हितासाठी स्वत:च्या विहिरिचे पाणी गावास उपलब्ध करु न दिले आहे . आगामी काळात गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावरपर्यंत प्रयत्न सुरु आहेत .- जया सावला, सरपंच, आसखेडा

टॅग्स :Nashikनाशिक