शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 00:59 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार ...

ठळक मुद्देप्रस्ताव येतात पण पडताळणीत फेटाळले जातात

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार दिवस पुरेल एवढे पाणी असले तरी प्रस्ताव फेटाळला जातो. अशा वेळी टीसीएल वगैरे जंतूनाशक वापरुन का होईना अशा विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे.

टंचाईग्रस्त गाव त्यांच्या वाड्या, पाडे यांचा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन ग्रामसेवक असे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कारवाईसाठी पाठवतात. त्यानंतर टंचाई शाखेचे संबंधित क्लर्क तो प्रस्ताव त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात पोहोच करतात. त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला व तेथून टंचाई शाखेकडे प्रस्ताव पाठवला जाऊन तो मंजूर होण्यास वेळच लागतो. पण प्रस्ताव मंजूर होण्यापुर्वी परत तो पडताळणीसाठी पाठवला जातो.

या पडताळणीमध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली जाते. ४/५ दिवस पुरेल अशा विहिरींचे दूषित पाणी प्यायल्याने मग उलट्या डायरिया आदींचा ग्रामस्थांनी त्रास सहन केला आहे. तर काही वेळा साथीचे रोग उद्‌भवतात. अशा विहिरीचे पाणी संपले की तो प्रस्ताव मंजूर होण्यास तीन आठवडे किंबहुना महिनाभर तरी लागतो. त्यानंतर टँकर किंवा विंधन विहीर जसे टंचाई आराखड्यात नमूद केलेले असते तशी उपाययोजना केली जाते.

सध्या मुरंबी वेळुंजेचा हेदपाडा वेळे सोमनाथनगर मुळेगाव व विनायक नगरचा प्रस्ताव आला होता. पण विनायक नगर येथे ठक्करबाप्पा योजनेतून विहीर घेतली होती. त्या विहिरीत ४/५ दिवस पुरेल एवढे पाणी होते. म्हणून जिप लपाचे उपअभियंता यांनी विनायक नगरीचा प्रस्ताव फेटाळला. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर