शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

हागणदारीमुक्ती योजनेला पाणीटंचाईची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:13 IST

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देअनेक गावांमध्ये लोटा बहाद्दरांचे दर्शन

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाने हागणदारी मुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली गेली. परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वर्तविली जात असल्याने या महत्त्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होईल याचे जणू हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमाँर्निग पथक तयार करून हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने प्रयोग केला. परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते. त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा राहत आहेत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे जाणकारातून बोलले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwater shortageपाणीकपात