शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

हागणदारीमुक्ती योजनेला पाणीटंचाईची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:13 IST

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देअनेक गावांमध्ये लोटा बहाद्दरांचे दर्शन

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाने हागणदारी मुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली गेली. परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वर्तविली जात असल्याने या महत्त्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होईल याचे जणू हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमाँर्निग पथक तयार करून हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने प्रयोग केला. परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते. त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा राहत आहेत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे जाणकारातून बोलले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwater shortageपाणीकपात