शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

हागणदारीमुक्ती योजनेला पाणीटंचाईची आडकाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:13 IST

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देअनेक गावांमध्ये लोटा बहाद्दरांचे दर्शन

लखमापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्त योजनेला पाणीटंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाने हागणदारी मुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुद्धा केली गेली. परंतु उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वर्तविली जात असल्याने या महत्त्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे अशी परिस्थिती निर्माण होईल याचे जणू हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही ठिकाणी ऐकायला मिळत आहे.स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमाँर्निग पथक तयार करून हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने प्रयोग केला. परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते. त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न नागरिकांसमोर सध्या उभा राहत आहेत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा, असे जाणकारातून बोलले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकारwater shortageपाणीकपात