शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोरोनासह पाणीटंचाई; दुहेरी संकटाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:26 IST

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात सीमारेषावरील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासीबहुल तालुक्यातील स्थलांतरित झालेले शेतमजूर शेकडो किलोमीटर पायपीट करीत घराकडे परतले असले तरी पाणीटंचाईच्या दुसऱ्या संकटाने या शेतमजुरांच्या वेदनांमध्ये अधिकच वाढ झाली आहे.

ठळक मुद्देआदिवासींचा लढा : काम आणि पाणी नाही

पेठ : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात सीमारेषावरील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासीबहुल तालुक्यातील स्थलांतरित झालेले शेतमजूर शेकडो किलोमीटर पायपीट करीत घराकडे परतले असले तरी पाणीटंचाईच्या दुसऱ्या संकटाने या शेतमजुरांच्या वेदनांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. हाताला काम नाही व प्यायला पाणी नाही अशी बिकट अवस्था या मजुरांची झाली आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगराळ भागात वसलेल्या या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरीही मार्च महिन्यानंतर मात्र येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असते. त्यामुळे होळीचा सण झाल्यावर आदिवासी भागातील मजूर केवळ पाणीटंचाई व रोजगाराचा अभाव यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह गुजरात, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आदी ठिकाणी कुटुंबासह स्थलांतरित होत असतात. याही वर्षी होळीची यात्रा संपल्यावर मजुरांनी गाव सोडले ते जून महिन्यात परतण्यासाठी, मात्र कामाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत देशात कोरोना विषाणूचा फैलाव झालेला होता. प्रसारमाध्यमांमधून कोरोना गाजत असताना शेतात, बांधकामावर काबाडकष्ट करणाºया या मजुरांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. नातेवाइकांनी फोन करून घरी निघून या असे सांगितल्यावर मजूरांनी आपले गाठोडे बांधून घरची वाट धरली मात्र तोपर्यंत देशात संचारबंदी लागू होऊन सर्व रस्ते सुनसान झाले होते. हजारो मजुरांनी रात्रीचा दिवस करून पायपीट करीत गाव गाठले.गाव, घर व कुटूंबातील माणसांचा सहवास लाभला असला तरी पाणीटंचाईचे भूत स्थलांतरीत मजूरांच्या मानगुटीवर बसले. एकीकडे कोरोनाची भिती, त्यामूळे केलेली गावबंदी, हाताला काम नसल्याने कमरेला दमडी नाही, घरातील सर्व खाणारी तोंडे रिकामटेकडी अशी बिकट स्थिती असतांना आता पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे. नद्या-नाले कोरडी पडल्याने मैलोगणती पायपीट करावे लागत आहे. प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांचे आराखडे तयार करून वरिष्ठांना पाठवण्यात आले असले तरी राज्य व जिल्हा प्रशासन कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये गुंतले असल्याने सरकारी कार्यालयातल्या पाणीटंचाईच्या फाईली सद्या तरी थप्पीला लागल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwater shortageपाणीकपात