शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाणी बचत ही लोकचळवळ बनावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:16 IST

पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे.

ठळक मुद्देअशोक सोनवणे : पिंपळगाव बसवंत येथे जलशाहिरी परिषद उत्साहात

पिंपळगाव बसवंत येथे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आयोजित जलशाहिरी परिषद उद्घाटन करताना प्रा. अशोक सोनवणे, प्रा. दिनेश अनारसे, प्रा. शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, नुमान शेख आदी.

 

 

पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे.पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व बी.पी. पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगांव बसवंत यांच्या वतीने बुधवारी पाचव्या जलशाहिरी परिषदेत प्रा. सोनवणे बोलत होते.सुफीकवी नुमान शेख अध्यक्षस्थानी होते. परिषदेस प्रा. दिनेश अनारसे, प्रा. किरण आरोटे, प्रा. कावेरी देवरे, प्रा. अमोल ताजने, प्रा. पगारे, प्रा. प्रकाश भंडारे, प्रा. सचिन बिडवे उपस्थित होते.कवी सोमनाथ गायकवाड, कवी भामरे व अभिषेक गांगुर्डे यांनी आपल्या जल, जंगल, जमीन-पर्यावरण संवर्धन काव्यगीते सादर केली. प्रास्ताविक प्रा. शरद दि. शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. महाकवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन चळवळीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, बुद्ध आंबेडकरवादी गीतांसोबतच त्यांनी जल जंगल जमीन पर्यावरण महिला, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या जीवनावर लेखन केले आहे. त्यांच्या याच साहित्य शाहिरीला उजाळा देऊन त्यांचा सामाजिक न्यायाचा ध्यास असलेले विचार व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कवी गायक लेखक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून पाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आपल्या साहित्य प्रतिभेचा हाती घेऊन आपण लोक कलेतून लोक मनोरंजन व लोक मनोरंजनातून लोक जागृती करीत राहावे याकरिता कर्डक यांचा स्मृतिदिन ‘लोकशाहीर’ म्हणून साजरा करण्यात आला.