शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जलसंपदा विभाग अखेर एक पाऊल मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:31 IST

शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्याची निश्चिती झाल्यानंतर करार न करताच महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर एक पाऊल मागे घेत करार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी महापालिकेस मसुदा पाठविल्याने याच आठवड्यात कार्यवाहीला मुहूर्त लागणार आहे.

ठळक मुद्देकराराला मुहूर्त : दंडाच्या रकमेची अंशत: रक्कम स्वीकारणार

नाशिक : शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्याची निश्चिती झाल्यानंतर करार न करताच महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर एक पाऊल मागे घेत करार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी महापालिकेस मसुदा पाठविल्याने याच आठवड्यात कार्यवाहीला मुहूर्त लागणार आहे. महापालिकेच्या दंडापोटी अंशत: रक्कम घेऊन कार्यवाही पुढे नेण्यात येणार असून, अन्य थकबाकी रकमेसाठी शासन निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.महापालिकेने केंद्र शासनाच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत शहरासाठी २०४१ पर्यंत वाढीव पाणीपुरवठ्यासाठी योजना आखली होती. त्यावेळी नाशिक शहरासाठी किकवी धरण बांधण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. परंतु २०११ नंतर महापालिकेशी करार करण्यात आला नव्हता. त्यावरून अनेक वाद सुरू होते. विशेषत: किकवी धरण न बांधतानाही सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी शंभर कोटी रुपयांहून अधिक रकमेची मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ही रक्कम भरली नाही म्हणून कराराचा मसुदा पाठवूनही महापालिकेला नाकारणाऱ्या जलसंपदा विभागाने आणखी उफराटे धोरण अवलंबले आणि करार केला नाही म्हणून गंगापूर धरणातील पाणी उचलल्याने मूळ दराच्या दीड ते दोनपट दंड केला होता. ही रक्कम प्रतिवर्षी वाढत चालली होती. महापालिकेकडून दरवर्षी करारासाठी पत्र दिल्यानंतर थकीत रक्कम भरण्याचे कारण दिले जात होते. गेल्यावर्षी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिंचन पुनर्स्थापना खर्च वसुलीबाबत शासन निर्णय घेईल, परंतु तोपर्यंत करार करण्याचे ठरले होते.महापालिकेने त्यानुसार गेल्या वर्षी बैठकीनंतर ताबडतोब पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता कुठे जलसंपदा विभाग तयार झाला आहे. यातील सिंचन पुनर्स्थापना खर्चाबाबत जलसंपदा विभागाची उच्चाधिकार समिती निर्णय घेणार असली तरी गंगापूर धरणातून पाणी विनाकरार घेतल्याने दीडपट ते दुप्पट रक्कम भरण्याविषयी वाद होते. परंतु हा निर्णयदेखील शासनाकडे सोपवित महापालिकेने अंशत: रक्कम भरून करार करून घ्यावा, या निर्णयाप्रत जलसंपदा विभाग आला आहे. तसा प्रस्ताव पालिकेला सादर झाला असून, याच आठवड्यात करार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रामाणिकपणे बिले अदाजलसंपदा विभागाने महापालिकेवर दंड आकारणी केली असली तरी दंडाची रक्कम न भरता नियमित होणारी रक्कम प्रशासन नियमितपणे भरत आहे. अनेक नगरपालिका किंवा शासकीय आस्थापना जलसंपदाची रक्कम थकवत असताना प्रत्यक्षात मात्र महापालिकेने प्रामाणिकपणे बिले अदा केली आहेत हे विशेष होय.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी