शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

पाणी आरक्षणाचे अधिकार पाटबंधारे प्राधिकरणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 02:05 IST

पाटबंधारे प्रकल्पातील बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित करण्याचे अधिकार आता जलनीतीनुसार पाटबंधारे प्राधिकरणाला बहाल करण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचेही यासंदर्भातील अधिकार कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी आरक्षणासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

ठळक मुद्देबैठकीची औपचारिकता : नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पाटबंधारे प्रकल्पातील बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित करण्याचे अधिकार आता जलनीतीनुसार पाटबंधारे प्राधिकरणाला बहाल करण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचेही यासंदर्भातील अधिकार कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी आरक्षणासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. पाणी आरक्षणासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना फेरप्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्णातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात त्यानुसार मंगळवारी (दि. १५) पाणीवापर संस्थांची बैठक बोलाविण्यात आल होती. मात्र या बैठकीत पाण्याचे हक्क आणि मंजुरीच्या अधिकाराबाबत चर्चा होऊन नवीन आदेशानुसार नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.या प्रस्तावाच्या आधारे यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरक्षणाचा निर्णय घेतला जात होता. तथापि १ डिसेंबर २०१८ मध्ये निघालेल्या निर्णयानुसार अधिकार आता पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी आरक्षणाचा निर्णय मुंबईतील पाटबंधारे महामंडळाच्या प्राधिकारणाकडून घेतले जाणार आहेत. बैठकीत याबाबतची माहिती संबंधित पाणीवापर संस्थांना देण्यात आली. नव्या आदेशानुसार गावातील लोकसंख्या, तेथील पशुधन, बाष्पीभवन, पाण्याचे वहनव्यय यांचा विचार करून पाणी आरक्षणाची मागणी करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार पिण्यासाठी १५ टक्के, औद्योगिकी क्षेत्रासाठी १० टक्के, आणि सिंचनासाठी ७५ टक्के असे पाणी निश्चितीचे सूत्र ठरविण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा संस्थांना प्रतिमाणशी ५५ लिटर, शहरी स्तरावर ७० लिटर प्रतिमाणशी पाणी देण्याचे नमूद करण्यात आलेले आहे.लोकसंख्या आणि लागणाºया पाण्याच्या नियोजनानुसार महापालिकेने यंदा ५ हजार दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. गतवर्षी पालिकेने ४ हजार ९०० इतके पाणी आरक्षित केले होते. मुकणे धरणातून अतिरिक्त पाणी मिळावे, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. परंतु आता महामंडळाकडे याबाबतचा प्रस्ताव जाणार असल्यामुळे पालिका नव्या प्रस्तावात अतिरिक्त किती पाणी मागणी नोंदविणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.लोकसंख्येनुसार पाणी आरक्षणशासनाने स्वीकारलेल्या नव्या जलनीती धोरणानुसार पाणी आरक्षण देताना संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांची लोकसंख्या, पशुधन यांचा विचार करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या वाढत्या दरानुसार दरवर्षी पाणी आरक्षण मिळणार आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीचा कोणता निकष यासाठी लागणार याबाबतची मात्र स्पष्टता नाही.आरक्षित पाण्याव्यतिरिक्त अधिकच्या पाण्याचा निर्णय आता महामंडळ प्राधिकरण घेणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी