शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाणी आरक्षणाचे अधिकार पाटबंधारे प्राधिकरणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 02:05 IST

पाटबंधारे प्रकल्पातील बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित करण्याचे अधिकार आता जलनीतीनुसार पाटबंधारे प्राधिकरणाला बहाल करण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचेही यासंदर्भातील अधिकार कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी आरक्षणासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

ठळक मुद्देबैठकीची औपचारिकता : नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पाटबंधारे प्रकल्पातील बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित करण्याचे अधिकार आता जलनीतीनुसार पाटबंधारे प्राधिकरणाला बहाल करण्यात आल्यामुळे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचेही यासंदर्भातील अधिकार कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी आरक्षणासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. पाणी आरक्षणासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना फेरप्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्णातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात त्यानुसार मंगळवारी (दि. १५) पाणीवापर संस्थांची बैठक बोलाविण्यात आल होती. मात्र या बैठकीत पाण्याचे हक्क आणि मंजुरीच्या अधिकाराबाबत चर्चा होऊन नवीन आदेशानुसार नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.या प्रस्तावाच्या आधारे यापूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरक्षणाचा निर्णय घेतला जात होता. तथापि १ डिसेंबर २०१८ मध्ये निघालेल्या निर्णयानुसार अधिकार आता पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी आरक्षणाचा निर्णय मुंबईतील पाटबंधारे महामंडळाच्या प्राधिकारणाकडून घेतले जाणार आहेत. बैठकीत याबाबतची माहिती संबंधित पाणीवापर संस्थांना देण्यात आली. नव्या आदेशानुसार गावातील लोकसंख्या, तेथील पशुधन, बाष्पीभवन, पाण्याचे वहनव्यय यांचा विचार करून पाणी आरक्षणाची मागणी करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे. नव्या आदेशानुसार पिण्यासाठी १५ टक्के, औद्योगिकी क्षेत्रासाठी १० टक्के, आणि सिंचनासाठी ७५ टक्के असे पाणी निश्चितीचे सूत्र ठरविण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा संस्थांना प्रतिमाणशी ५५ लिटर, शहरी स्तरावर ७० लिटर प्रतिमाणशी पाणी देण्याचे नमूद करण्यात आलेले आहे.लोकसंख्या आणि लागणाºया पाण्याच्या नियोजनानुसार महापालिकेने यंदा ५ हजार दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. गतवर्षी पालिकेने ४ हजार ९०० इतके पाणी आरक्षित केले होते. मुकणे धरणातून अतिरिक्त पाणी मिळावे, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. परंतु आता महामंडळाकडे याबाबतचा प्रस्ताव जाणार असल्यामुळे पालिका नव्या प्रस्तावात अतिरिक्त किती पाणी मागणी नोंदविणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.लोकसंख्येनुसार पाणी आरक्षणशासनाने स्वीकारलेल्या नव्या जलनीती धोरणानुसार पाणी आरक्षण देताना संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांची लोकसंख्या, पशुधन यांचा विचार करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या वाढत्या दरानुसार दरवर्षी पाणी आरक्षण मिळणार आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढीचा कोणता निकष यासाठी लागणार याबाबतची मात्र स्पष्टता नाही.आरक्षित पाण्याव्यतिरिक्त अधिकच्या पाण्याचा निर्णय आता महामंडळ प्राधिकरण घेणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी